गर्भवती पत्नीला पतीनेच निर्घृणपणे संपवले

नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एक हत्येची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आलं आहे. यात चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीने 19 वर्षीय गर्भवती पत्नीचा खून (Crime News) केल्याची घटना घडलीय. पतीने पत्नीचा गळा आवळून खून करत मृतदेह गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळील नदीकिनारी फेकून दिलाय.


दरम्यान, पतीने पोलिसात पत्नी हरवल्याची माहिती दिली असता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कसून तपास केला. अखेर या प्रकरणात तपासाचे चक्र गतिमान करत पोलिसांनी पतीचे बिंग फोडत आरोपीला अटक केली आहे.



पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विकी रॉय यादव या वीस वर्षीय पतीला ताब्यात घेतले आहे. चारित्र्याच्या संशय व विवाहात सासऱ्यांनी काहीही न दिल्याने माहेरून पैसे आणावे यासाठी पत्नीचा छळ सुरू होता. अशातच, सततच्या भांडणानंतर पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली देखील आरोपीने दिली आहे.


अमृता कुमारी यादव ही मूळ नेपाळमधील असल्याची देखील माहिती समोर आली आहे. नाशिक तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा न्यायालयात आरोपीला दाखल केले असल्याची माहिती तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आमले यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे