Champions Trophy 2025: भारताच्या विजयाने रोहितच्या नावावर ऐतिहासिक रेकॉर्ड, धोनी-विराटला टाकले मागे

मुंबई: भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सेमीफायनलमध्ये दमदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला हरवले. टीम इंडियाने दुबईत खेळवण्यात आलेल्या सामन्यात ४ विकेटनी विजय मिळवला. यासोबतच भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. संघाच्या विजयासोबत कर्णधार रोहित शर्माच्या नावावर खास रेकॉर्ड झाला. त्याने इतिहास रचला आहे. रोहित आयसीसीच्या चार स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला कर्णधार ठरला आहे.


ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४८.१ षटकांत ६ विकेट गमावत हे लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला. विराट कोहलीने कमालीची फलंदाजी केली. कोहलीने ९८ बॉलचा सामना करताना ८४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने ४५ धावांची खेळी केली. लोकेश राहुल ४२ धावांवर नाबाद राहिला. भारताने हा सामना ४ विकेट राखत जिंकला.



याबाबतीत रोहित धोनी-विराटच्या पुढे


रोहित चार आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने याबाबतीत महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीलाही मागे टाकले. भारताने धोनीच्या नेतृत्वात तीन महत्त्वाचे खिताब जिंकले होते. मात्र धोनीच्या नेतृत्वात संघाला चार स्पर्धांच्या फायनलमध्ये खेळता आले नव्हते. भारताने धोनीच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्डकप २००७, वनडे वर्ल्डकप २०११ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३मधील जेतेपद जिंकले होते.



रोहितच्या नेतृत्वात खेळले हे फायनल सामने


भारताने रोहितच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३मध्ये स्थान मिळवले होते. येथे ऑस्ट्रेलियाने त्यांना २०९ धावांनी हरवले होते. यानंतर ते वनडे वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये पोहोचले. येथेही त्यांना ऑस्ट्रेलियाने हरवले होते. भारताने रोहितच्या नेतृत्वात टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये फायनलमध्ये स्थान मइळवले. हा खिताब टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलमध्ये ते पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला