मधमाशांच्या हल्ल्यात १६ विद्यार्थी गंभीर जखमी

Share

नाशिक: त्र्यंबकरोडवरील संदीप युनिव्हर्सिटीच्या आवारात मधमाशांचे पोळे अचानक वरून खाली पडल्याने मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात १६ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

यामध्ये दोघांच्या डोळ्यात व कानात मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून, इतर १४ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर अशोकनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या एस. बिल्डिंग क्लॉक टॉवरजवळ मधमाशांनी हा हल्ला केला.

या घटनेत शुभम् गुंजाळ याला मधमाशांनी घेरल्याने गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमध्ये आकांक्षा पाटील, अंशी कसबे, भावेश राऊत, प्रसन्नजित वाघोळे, मोहित जाधव, संदीप शेरे व महेश बोरसे यांचा समावेश आहे.

Recent Posts

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

13 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

28 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

37 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

57 minutes ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago

बर्फाचा चुरा दुधी का दिसतो?

प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…

1 hour ago