Water Shortage : उन्हाळ्याच्या तोंडावर त्र्यंबकेश्वरात पाणीबाणी!

त्र्यंबकेश्वर : त्रंबकेश्वर येथे एक दिवसाआड पाणीपुरवठा त्रिंबक नगर परिषदेने मार्चपासून सुरू केला आहे. त्रंबकेश्वर मध्ये मे महिन्यात मोठी पाणीटंचाई जाणवते हे लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन लक्षात घेऊन व वाढता उन्हाळा लक्षात घेऊन नगरपालिकेने यंदा मार्च महिन्यापासूनच पाणी कपात सुरू केली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. नगरपालिका पाणीपुरवठा विभागातून वरील माहिती देण्यात आली. (Water Shortage)



ज्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये असलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये पडणाऱ्या पावसाने मुंबई ठाणे मराठवाडा नाशिक नगर सह अन्य काही भागांमध्ये पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे त्याच त्र्यंबक नगरीमध्ये पाण्याची टंचाई जाणू लागली आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने आता एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे भविष्यामध्ये पाणी पुरले पाहिजे या दृष्टिकोनातून ही पावलं उचलली जात असल्याचे नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जात असले तरी देखील त्र्यंबकेश्वरला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे त्यामुळेच पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.दरम्यान मार्च मार्च एंड लक्षात घेऊन नागरिकांनी थकीत व चालू घरपट्टी पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या कर विभागाने वसुली विभागाने पाणीपट्टी विभागाने केले आहे. एप्रिल मे अखेर अथवा पाऊस लांबल्यास दोन दिवसाआड पाणीपुरवठा देखील होऊ शकतो. १८ ते २० हजार लोक वस्तीसाठी ही स्थिती आहे. तर दुसरीकडे भव्य दिव्य सिंहस्थ कुंभमेळ्याची स्वप्न रंगवली जात आहे.


कुंभमेळ्यासाठी गौतमी गोदावरी धरणातून ज्यादा पाणी उचलण्याची योजना होणार आहे. नियोजन आहे. पण ती पुरेशी होईल काय ? अशी देखील नागरिकांना काळजी पडला आहे. थोडक्यात गोदावरीच्या उगमस्थानला तहान लागली आहे.

Comments
Add Comment

Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच,

Pune: बांगलादेशच्या झेंड्यावरून फूड स्टॉल्सची तोडफोड; पुण्यातील MIT कॉलेजमध्ये राडा

पुणे: पुण्यातील कोथरुड येथील एमआयटी महाविद्यालयात आयोजित वर्ल्ड कल्चरल फेस्टिवलमध्ये मोठा राडा झाला आहे. फूड

राज्यात हवामानात बदलाचे संकेत; फेब्रुवारीत 'या दिवशी' काही भागांत कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरडे वातावरण राहिल्यानंतर आता राज्यात हवामानाची घडी बदलताना दिसत आहे.

Nashik MNS Protest: शिक्षकाने मराठी बोलण्यास विरोध केल्याने मनसे कार्यकर्त्यांचा राडा

नाशिक: नाशिकमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. एका प्रसिद्ध कोचिंग क्लासमध्ये मनसे