Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा; सुरेश धसांचा पुढचा प्लॅन काय?

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही लढाई सुरूच रहाणार – सुरेश धस


परळी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) प्रकरणी मोठ्या दबावाखाली धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणावरून सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुढील लढाईचा इशारा दिला आहे. (Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation)


वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची सोशल मिडिया पोस्ट धनंजय मुंडेंनी केली आहे. यानंतर आता सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय प्लॅन आहे, याबद्दल सांगितलं आहे.



सुरेश धस यांची प्रतिक्रिया


राजीनामा म्हणजे पूर्णविराम नसून, लढाई आणखी तीव्र होईल, असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे आभार मानत, दोन आठवड्यांपूर्वीच अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले. तसेच, आता या प्रकरणाच्या तपासात कोणताही दबाव राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.



सुरेश धस यांनी पुढील तपासाबाबतही वक्तव्य केले:


सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल झाल्यानंतर आणखी कारवाई होईल.


तपासासाठी कॉल रेकॉर्डिंग आणि काही अधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे.


हा लढा थांबणार नाही, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.





परळीतील नागरिकांना दिलासा


परळीमध्ये या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात तणाव होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर परळीतील लोक सुटकेचा निश्वास सोडतील, असे सुरेश धस म्हणाले. आता मोठ्या आकाच्या मागे कोणताही राजकीय आधार उरला नसल्याने, अनेकजण पुढे येऊन तक्रारी करतील, असा दावा त्यांनी केला.



लढाई कायम राहणार


सुरेश धस यांनी सांगितले की, राजीनामा हा शेवट नाही, राष्ट्रपतींकडे माफीनामा गेला तरी लढाई सुरूच राहील. दोषींना फाशी होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा