Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा; सुरेश धसांचा पुढचा प्लॅन काय?

  39

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही लढाई सुरूच रहाणार – सुरेश धस


परळी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) प्रकरणी मोठ्या दबावाखाली धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणावरून सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुढील लढाईचा इशारा दिला आहे. (Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation)


वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची सोशल मिडिया पोस्ट धनंजय मुंडेंनी केली आहे. यानंतर आता सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय प्लॅन आहे, याबद्दल सांगितलं आहे.



सुरेश धस यांची प्रतिक्रिया


राजीनामा म्हणजे पूर्णविराम नसून, लढाई आणखी तीव्र होईल, असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे आभार मानत, दोन आठवड्यांपूर्वीच अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले. तसेच, आता या प्रकरणाच्या तपासात कोणताही दबाव राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.



सुरेश धस यांनी पुढील तपासाबाबतही वक्तव्य केले:


सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल झाल्यानंतर आणखी कारवाई होईल.


तपासासाठी कॉल रेकॉर्डिंग आणि काही अधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे.


हा लढा थांबणार नाही, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.





परळीतील नागरिकांना दिलासा


परळीमध्ये या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात तणाव होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर परळीतील लोक सुटकेचा निश्वास सोडतील, असे सुरेश धस म्हणाले. आता मोठ्या आकाच्या मागे कोणताही राजकीय आधार उरला नसल्याने, अनेकजण पुढे येऊन तक्रारी करतील, असा दावा त्यांनी केला.



लढाई कायम राहणार


सुरेश धस यांनी सांगितले की, राजीनामा हा शेवट नाही, राष्ट्रपतींकडे माफीनामा गेला तरी लढाई सुरूच राहील. दोषींना फाशी होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित