Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडेंचा राजीनामा; सुरेश धसांचा पुढचा प्लॅन काय?

Share

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही लढाई सुरूच रहाणार – सुरेश धस

परळी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) प्रकरणी मोठ्या दबावाखाली धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणावरून सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुढील लढाईचा इशारा दिला आहे. (Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation)

वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची सोशल मिडिया पोस्ट धनंजय मुंडेंनी केली आहे. यानंतर आता सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय प्लॅन आहे, याबद्दल सांगितलं आहे.

सुरेश धस यांची प्रतिक्रिया

राजीनामा म्हणजे पूर्णविराम नसून, लढाई आणखी तीव्र होईल, असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे आभार मानत, दोन आठवड्यांपूर्वीच अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले. तसेच, आता या प्रकरणाच्या तपासात कोणताही दबाव राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सुरेश धस यांनी पुढील तपासाबाबतही वक्तव्य केले:

सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल झाल्यानंतर आणखी कारवाई होईल.

तपासासाठी कॉल रेकॉर्डिंग आणि काही अधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे.

हा लढा थांबणार नाही, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

परळीतील नागरिकांना दिलासा

परळीमध्ये या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात तणाव होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर परळीतील लोक सुटकेचा निश्वास सोडतील, असे सुरेश धस म्हणाले. आता मोठ्या आकाच्या मागे कोणताही राजकीय आधार उरला नसल्याने, अनेकजण पुढे येऊन तक्रारी करतील, असा दावा त्यांनी केला.

लढाई कायम राहणार

सुरेश धस यांनी सांगितले की, राजीनामा हा शेवट नाही, राष्ट्रपतींकडे माफीनामा गेला तरी लढाई सुरूच राहील. दोषींना फाशी होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

1 hour ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

1 hour ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

2 hours ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago