Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन – "न्यायाला विलंब होऊ नये, आम्ही कटिबद्ध"

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे (Santosh Deshmukh Murder Case) फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अधिकृत निवेदन (NCP statement after Dhananjay Munde's post) जारी करण्यात आले आहे.



संतोष देशमुख हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी


या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, संतोष देशमुख हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही पक्षाची ठाम भूमिका आहे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील पक्षाच्या नेत्यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी स्वतः राजीनामा दिला, ही सकारात्मक बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





पक्ष कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा यासाठी वचनबद्ध


राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, पक्ष कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा यासाठी वचनबद्ध आहे आणि न्यायप्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप करणार नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन नैतिकता जपली असून, न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचे पक्षाने सांगितले. या प्रकरणाची चौकशी कोणत्याही दबावाशिवाय पार पडेल, असे आश्वासनही निवेदनातून देण्यात आले आहे.



आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा


संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे.





न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास


या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक महत्त्वाचा संदेश देत आहे. न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.


Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध