MSME : भारताच्या आर्थिक विकासात एमएसएमईंची महत्त्वपूर्ण भूमिका – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारताच्या आर्थिक प्रगतीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई-MSME) परिवर्तनकारी भूमिका बजावत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.


"वाढ, उत्पादन, निर्यात आणि अणुऊर्जेचे इंजिन" या विषयावरील वेबिनारला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सरकार स्वावलंबी भारताच्या दृष्टीकोनातून काम करत आहे आणि सुधारणा आणण्याचा वेग वाढवत आहे. आज देशात ६ कोटींहून अधिक एमएसएमई कार्यरत असून, यामुळे कोट्यवधी लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.



एमएसएमईंसाठी व्यापक योजना


पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, "यंदाच्या अर्थसंकल्पात एमएसएमईंची व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली आहे, जेणेकरून या क्षेत्रातील उद्योगांना अधिक संधी आणि आत्मविश्वास मिळेल. परिणामी, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील."



मोदी यांनी नमूद केले की, उत्पादन-संबंधित प्रोत्साहन (PLI) योजनेचा १४ उद्योगांना लाभ झाला असून, आतापर्यंत ७५० हून अधिक युनिट्स मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक, १३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पादन, आणि ५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्यात झाली आहे.



आर्थिक सुधारणांचा वेग आणि पारदर्शकता


ते पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारताने आर्थिक सुधारणा, पारदर्शकता, आणि समावेशक विकास यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सरकार उद्योगांसाठी सोयीस्कर आर्थिक वातावरण निर्माण करत आहे आणि एमएसएमईंना वित्तीय मदत सहज मिळावी यासाठी नव्या पद्धती शोधत आहे.


"५ लाख नवोदित महिला उद्योजक, अनुसूचित जाती आणि जमातीतील उद्योजकांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.



भारतीय उत्पादकांना संधी


मोदींनी असेही सांगितले की, कोविडच्या आर्थिक परिणामांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात भारत यशस्वी ठरला असून, त्यामुळे देश जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे.


आज जगभरातील देश भारतासोबत आर्थिक भागीदारी मजबूत करू इच्छित आहेत. त्यामुळे भारतीय उद्योजक आणि उत्पादकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या