MSME : भारताच्या आर्थिक विकासात एमएसएमईंची महत्त्वपूर्ण भूमिका – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारताच्या आर्थिक प्रगतीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई-MSME) परिवर्तनकारी भूमिका बजावत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.


"वाढ, उत्पादन, निर्यात आणि अणुऊर्जेचे इंजिन" या विषयावरील वेबिनारला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सरकार स्वावलंबी भारताच्या दृष्टीकोनातून काम करत आहे आणि सुधारणा आणण्याचा वेग वाढवत आहे. आज देशात ६ कोटींहून अधिक एमएसएमई कार्यरत असून, यामुळे कोट्यवधी लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.



एमएसएमईंसाठी व्यापक योजना


पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, "यंदाच्या अर्थसंकल्पात एमएसएमईंची व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली आहे, जेणेकरून या क्षेत्रातील उद्योगांना अधिक संधी आणि आत्मविश्वास मिळेल. परिणामी, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील."



मोदी यांनी नमूद केले की, उत्पादन-संबंधित प्रोत्साहन (PLI) योजनेचा १४ उद्योगांना लाभ झाला असून, आतापर्यंत ७५० हून अधिक युनिट्स मंजूर करण्यात आल्या आहेत. यामुळे १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक, १३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पादन, आणि ५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्यात झाली आहे.



आर्थिक सुधारणांचा वेग आणि पारदर्शकता


ते पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत भारताने आर्थिक सुधारणा, पारदर्शकता, आणि समावेशक विकास यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सरकार उद्योगांसाठी सोयीस्कर आर्थिक वातावरण निर्माण करत आहे आणि एमएसएमईंना वित्तीय मदत सहज मिळावी यासाठी नव्या पद्धती शोधत आहे.


"५ लाख नवोदित महिला उद्योजक, अनुसूचित जाती आणि जमातीतील उद्योजकांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.



भारतीय उत्पादकांना संधी


मोदींनी असेही सांगितले की, कोविडच्या आर्थिक परिणामांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात भारत यशस्वी ठरला असून, त्यामुळे देश जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे.


आज जगभरातील देश भारतासोबत आर्थिक भागीदारी मजबूत करू इच्छित आहेत. त्यामुळे भारतीय उद्योजक आणि उत्पादकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Comments
Add Comment

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत