PM Modi : भारताच्या स्थिर धोरणांमुळे जागतिक भागीदारीला चालना: पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारताच्या स्थिर आणि दीर्घकालीन धोरणांमुळे आज संपूर्ण जग भारतासोबतची आर्थिक भागीदारी मजबूत करण्यास इच्छुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. गेल्या दशकभरात सातत्यपूर्ण धोरणांमुळे भारत गुंतवणुकीसाठी एक आकर्षक केंद्र बनला आहे, असे ते म्हणाले.


एमएसएमई क्षेत्रासाठी आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये बोलताना मोदींनी उद्योग आणि निर्यातीतील सर्व भागधारकांना आश्वस्त केले की, भविष्यातही धोरणांमध्ये स्थिरता कायम राहील. तसेच, उत्पादन क्षेत्राने या वाढत्या भागीदारीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


"देशाच्या विकासासाठी स्थिर धोरणे आणि अनुकूल व्यवसाय वातावरण महत्त्वाचे आहे," असे सांगताना मोदींनी गेल्या काही वर्षांत सरकारने केलेल्या सुधारणा अधोरेखित केल्या. जन विश्वास कायद्याद्वारे अनुपालनातील अडथळे दूर करण्यात आले असून, केंद्र आणि राज्य सरकारांनी ४०,००० हून अधिक अनावश्यक अनुपालन रद्द केल्याने उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे.



सरकारने कर प्रणाली सुलभ करण्यासाठी पावले उचलली असून, जन विश्वास २.० विधेयकावर काम सुरू असल्याचेही मोदींनी सांगितले. तसेच, गैर-वित्तीय क्षेत्रातील नियमांचे पुनरावलोकन करून त्यांना अधिक लवचिक आणि जनहितैषी बनवण्याच्या उद्देशाने एक समिती स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.


एमएसएमई क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की, हे क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासात परिवर्तन घडवत आहे. सरकार स्वावलंबी भारताच्या दिशेने ठोस पावले उचलत असून, याच दृष्टीकोनातून एमएसएमई क्षेत्राच्या व्याख्येत विस्तार करण्यात आला आहे, ज्यामुळे तरुणांना अधिक रोजगाराच्या संधी मिळतील.


पीएलआय योजनेच्या माध्यमातून १४ क्षेत्रांना फायदा होत असून, ७५० हून अधिक युनिट्स मंजूर झाल्या आहेत. यामुळे १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित झाली असून, १३ लाख कोटी रुपयांचे उत्पादन आणि ५ लाख कोटी रुपयांची निर्यात झाली आहे, अशी माहिती मोदींनी दिली.


कर्जसुविधा अधिक प्रभावी करण्यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, एमएसएमईंना कमी व्याजदरात आणि वेळेत कर्ज उपलब्ध होईल, यासाठी नवीन उपाययोजना आवश्यक आहेत. विशेषत: महिला, अनुसूचित जाती आणि जमातीतील ५ लाख उद्योजकांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.


मोदींनी व्यवसाय क्षेत्रातील भागधारकांना सरकारी धोरणांच्या सुलभतेचा लाभ घेऊन उत्पादन आणि निर्यातीमध्ये नवे मार्ग शोधण्याचे आवाहन केले. भारताच्या स्थिर धोरणांमुळे जागतिक स्तरावर आर्थिक सहकार्य वाढत असून, हे सहकार्य भविष्यातही अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी