Bihar Buddhgaya : महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी

मुंबई : महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली ते बिहारमधील बुद्धगया (Bihar Buddhgaya) जगातील सर्व बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचे आहे. महाबोधी टेम्पल कायदा रद्द करून महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापन समितीमध्ये सर्व विश्वस्त बौद्ध धम्माचे नियुक्त करावेत. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या हा आज ऐतिहासिक धम्म परिषदेत मंजूर ठराव बिहारच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कळवणार आहे. तसेच लवकरच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्याचा आपला निर्धार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.



श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या ९५ व्या वर्धापन दिनानिमित्त देश-विदेशातील भिक्खू संघाच्या अनुयायांच्या उपस्थितीत रविवारी दि. २ मार्च रोजी नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदानावर बौध्द धम्म परिषद रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी सीमाताई आठवले यांचा सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष प्रकाश लोंढे, समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. बौध्द भिक्खु संघाने यावेळी बुध्दगया येथील भगवान बुध्दांचे परमपवित्र स्थान बौध्द भिक्खु संघाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून