Girls Birth Rate : मुलींचा घटणारा जन्मदर चिंता वाढविणारा

रत्नागिरी : मागील पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार ३२ मुलगे आणि ३२ हजार १२६ मुली असे मिळून ६६ हजार १५८ मुलांचा जन्म झाला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर (Girls Birth Rate) हा कमी होत आहे. पाच वर्षांपूर्वी हजार मुलांमागे ९५७ मुली जन्मल्या होत्या. तर २०२४-२५ या वर्षात हजार मुलांमागे ९४४ मुलीं जन्मल्याचे दिसते. घटणारी आकडेवारी चिंता वाढवणारी ठरणार असून मुलींचा जन्मदर स्थिर राखण्याचे आव्हान राहणार आहे.



वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलगा हवा, अशी अनेक वर्षापूर्वीची मानसिकता कुटुंबांमध्ये पाहायला मिळत होती. या मानसिकतेत बदल करण्यासाठी शासनाने ‘बेटी बचाओ’सारखे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. शासन-प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याकडून लोकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी अशा प्रचलित म्हणीवरून स्त्रीजन्माचे महत्त्वही विशद केले जात आहे; मात्र गेल्या पाच वर्षात मुलींचा जन्मदर कमी-अधिक राहत असल्याचे दिसत आहे. पूर्वी एका कुटुंबामध्ये अनेक मुले जन्माला येत होती. शासनाने संतती नियोजनाच्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. समाजात झालेले बदल, शिक्षणाचा वाढलेला टक्का, बदलते राहणीमान आदींमुळे कुटुंबे सुशिक्षित झाली आहेत.


समाज जडणघडणीत वंशाचा दिवा हवाच ही मानसिकता कमी झालेली आहे. कायद्याद्वारे लिंगनिदान, स्त्री भ्रूणहत्या करण्यास शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासनातर्फे माझी भाग्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांसारख्या योजनाही राबवल्या जात आहेत. मात्र दरवर्षी जन्माला येणाऱ्या मुलांच्या आकडेवारीचा विचार करता मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा जन्मदर कमी होत आहे. २०२०-२१ मध्ये ८ हजार ४५ मुले तर ७ हजार ७०३ मुली जन्माला आल्या. त्यावर्षी जन्मदर ९५७ होता तर २०२३-२४ मध्ये जन्मदर ९१८ आणि २०२४-२५ मध्ये जन्मदर ९४२ राहिलेला आहे. त्यामुळे काही अंशाने जन्मदर कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची