Girls Birth Rate : मुलींचा घटणारा जन्मदर चिंता वाढविणारा

रत्नागिरी : मागील पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार ३२ मुलगे आणि ३२ हजार १२६ मुली असे मिळून ६६ हजार १५८ मुलांचा जन्म झाला आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर (Girls Birth Rate) हा कमी होत आहे. पाच वर्षांपूर्वी हजार मुलांमागे ९५७ मुली जन्मल्या होत्या. तर २०२४-२५ या वर्षात हजार मुलांमागे ९४४ मुलीं जन्मल्याचे दिसते. घटणारी आकडेवारी चिंता वाढवणारी ठरणार असून मुलींचा जन्मदर स्थिर राखण्याचे आव्हान राहणार आहे.



वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलगा हवा, अशी अनेक वर्षापूर्वीची मानसिकता कुटुंबांमध्ये पाहायला मिळत होती. या मानसिकतेत बदल करण्यासाठी शासनाने ‘बेटी बचाओ’सारखे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. शासन-प्रशासन, सामाजिक संस्था यांच्याकडून लोकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी अशा प्रचलित म्हणीवरून स्त्रीजन्माचे महत्त्वही विशद केले जात आहे; मात्र गेल्या पाच वर्षात मुलींचा जन्मदर कमी-अधिक राहत असल्याचे दिसत आहे. पूर्वी एका कुटुंबामध्ये अनेक मुले जन्माला येत होती. शासनाने संतती नियोजनाच्या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. समाजात झालेले बदल, शिक्षणाचा वाढलेला टक्का, बदलते राहणीमान आदींमुळे कुटुंबे सुशिक्षित झाली आहेत.


समाज जडणघडणीत वंशाचा दिवा हवाच ही मानसिकता कमी झालेली आहे. कायद्याद्वारे लिंगनिदान, स्त्री भ्रूणहत्या करण्यास शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासनातर्फे माझी भाग्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांसारख्या योजनाही राबवल्या जात आहेत. मात्र दरवर्षी जन्माला येणाऱ्या मुलांच्या आकडेवारीचा विचार करता मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा जन्मदर कमी होत आहे. २०२०-२१ मध्ये ८ हजार ४५ मुले तर ७ हजार ७०३ मुली जन्माला आल्या. त्यावर्षी जन्मदर ९५७ होता तर २०२३-२४ मध्ये जन्मदर ९१८ आणि २०२४-२५ मध्ये जन्मदर ९४२ राहिलेला आहे. त्यामुळे काही अंशाने जन्मदर कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह