IPL 2025 : अजिंक्य रहाणे ठरला कोलकाता संघाचा नवा कॅप्टन

मुंबई : आगामी २३ मार्चपासून आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.याआधीच सर्व संघांनी आपल्या संघाचे कर्णधार जाहीर केले आहे. आता कोलकाता संघाने आपला कर्णधार जाहीर केला आहे. मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे याच्याकडे कोलकाता संघाने कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणे कोलकाता संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.


गत हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता संघाने विजेतेपद मिळवले होते. परंतु यंदाच्या साली झालेल्या लिलावात कोलकात्याने श्रेयस अय्यरला संघातून मुक्त केले. त्याच्याजागी कोलकाता संघाने रहाणेला मूळ किंमतीवर खरेदी करून त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाकडून तो खेळत होता. यावेळी चेन्नईने त्याला संघात कायम ठेवले नव्हते. अशावेळी आयपीएल २०२५ च्या लिलावात, कोलकाता संघाने रहाणेला केवळ मूळ किंमतीवर (बेस प्राईज) खरेदी केले. त्याची मूळ किंमत १.५० कोटी रुपये होती.



३६ वर्षीय अजिंक्य रहाणेने आतापर्यंत आयपीएलमध्ये १८५ सामने खेळले आहेत. त्याने ३०.१४ च्या सरासरीने ४६४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १२३.४२ होता. आयपीएलमध्ये त्याने २ शतके आणि ३० अर्धशतके केली आहेत.आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघ कशा प्रकारे आपली कामगिरी करतो हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण