वाढत्या उष्णतेमुळे मुंबईतील झाडांची सर्वे मोहिम

धोकादायक झाडे तुटून पडण्याची शक्यता


मुंबई (प्रतिनिधी): सध्या उष्णतेची लहर वाढल्याने मुंबईतील अनेक झाडांची मुळे सुकली जावून ती तुटली जात आहेत आणि ही झाडे उन्मळून किंवा त्यांच्या फांद्या तुटून पडत असल्याने महापालिकेच्यावतीने आता रस्त्यालगतच्या सर्व झाडांचा सर्वे करण्यात येणार आहे. त्यामुळे या झाडांचा सर्वे करून मुंबईतील धोकादायक झाडे आणि झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्यासाठी आता प्राधान्यक्रम देण्यात येत आहे.


मुंबईत सध्या २९ लाख ७५ हजार २८३ झाडे असून त्यातील रस्त्याच्याकडेला १ लाख ८५ हजार ३३३ झाडे आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे भविष्यात रस्त्यालगतची झाडांची पडझड होण्याची भीती वर्तवली जात असून या सर्व पार्श्वभूमीवर आता महापालिकेच्या सर्व विभागांतील झाडांची पाहणी करून झाडांचे मूळ आणि कूळ शोधून ती झाडे पडून होणारी संभाव्य दुघर्टना टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच दृष्टीकोनातून मुंबईतील झाडांचा सर्वे करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे.


महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या अचानकपणे उन्हाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे आणि याचा परिणामी झाडांच्या मुळांवर होत आहे. उष्णतेची लहर वाढल्याने जमिनीखालील पाण्याचे प्रमाण कमी होवून झाडांची मुळे सुकली जातात आणि हीच मुळे सुकल्याने ती तुटली जावून झाडे कोलमडून पडतात किंवा फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे मुंबईतील २४ विभागांमधील प्रत्येक झाड वाचण्याच्या दृष्टीकोनातून सर्वे हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार धोकादायक झाड असेल त्याचे खोडापर्यंत कापणी केली जाणार आहे किंवा एका बाजूला झाडांच्या फांद्या कलंडलेल्या असल्यास त्या फांद्याची छाटणी केली जाईल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला असून उष्णतेची लहर वाढल्याने याचा परिणाम झाडांवर होण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीकोनातून सर्वे करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यानुसार या सर्वेमध्ये एखादे झाड धोकादायक किंवा त्यांच्या फांद्या धोकादायक असल्याचे आढळून आल्यास त्या फांद्याची छाटणी तातडीने हाती घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)