जळगावातील धक्कादायक घटना, राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची काढली छेड

जळगाव : केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्या मुलीची तसेच इतर काही मुलींची छेड काढण्याचा प्रकार मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेत घडला. या प्रकरणी मुलींनी पोलिसांना माहिती देऊनही कारवाई झाली नाही. अखेर राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीच पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.



यात्रेत घटना घडली त्यावेळी त्या भागात एक पोलीस होता. मुलींनी तक्रार करताच तो पोलीस घटनास्थळी आला. पण छेड काढणारे गटाने उभे होते. संख्येने जास्त असल्याचा गैरफायदा घेत त्यांनीच पोलिसाला मारहाण केली, त्यानंतर या प्रकरणात पोलिसांची कारवाई थंडावली आहे; असे एकनाथ खडसे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीच दखल घ्यावी आणि छेड काढणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.



काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वारगेट एसटी डेपोतील एका रिकाम्या बसमध्ये बलात्कार घडल्याची तक्रार पोलिसांकडे आली. पाठोपाठ राज्यमंत्र्‍यांच्या मुलीची छेड काढण्यात आल्याचे वृत्त आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर घडलेल्या या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. विरोधक या मुद्यावरुन महायुती सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर