जळगावातील धक्कादायक घटना, राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची काढली छेड

जळगाव : केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्या मुलीची तसेच इतर काही मुलींची छेड काढण्याचा प्रकार मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेत घडला. या प्रकरणी मुलींनी पोलिसांना माहिती देऊनही कारवाई झाली नाही. अखेर राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीच पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.



यात्रेत घटना घडली त्यावेळी त्या भागात एक पोलीस होता. मुलींनी तक्रार करताच तो पोलीस घटनास्थळी आला. पण छेड काढणारे गटाने उभे होते. संख्येने जास्त असल्याचा गैरफायदा घेत त्यांनीच पोलिसाला मारहाण केली, त्यानंतर या प्रकरणात पोलिसांची कारवाई थंडावली आहे; असे एकनाथ खडसे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीच दखल घ्यावी आणि छेड काढणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.



काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वारगेट एसटी डेपोतील एका रिकाम्या बसमध्ये बलात्कार घडल्याची तक्रार पोलिसांकडे आली. पाठोपाठ राज्यमंत्र्‍यांच्या मुलीची छेड काढण्यात आल्याचे वृत्त आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर घडलेल्या या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. विरोधक या मुद्यावरुन महायुती सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे