Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांना ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान

  42

मुंबई : सुप्रसिद्ध कलावंत व व्याख्याते शरद पोंक्षे यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विचार मंच’ या अतिशय प्रतिष्ठित अशा सामाजिक संस्थेतर्फे, संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र भाजपाचे राज्य प्रवक्ता अवधूत वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख ५१ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.




याचबरोबर ‘पुरुष’ नाटकाचे नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पुरुष’ नाटकाचे निर्माते संतोष काणेकर, श्रीकांत तटकरे तसेच दिग्दर्शक राजन ताम्हाणे कलाकार अविनाश नारकर, स्पृहा जोशी, अनुपमा ताकमोगे, नेहा परांजपे, निषाद भोईर, संतोष पैठणे, ऋषिकेश रत्नपारखी तसेच या नाटकाचे पुरस्कर्ते राजेश गाडगीळ यांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दादर येथील शिवाजी मंदिरात रंगलेल्या या कार्यक्रमाला चित्रपट व रंगभूमी क्षेत्रातील अनेक दिगजांसहित मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी यांनी केले.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.