Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांना ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान

मुंबई : सुप्रसिद्ध कलावंत व व्याख्याते शरद पोंक्षे यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विचार मंच’ या अतिशय प्रतिष्ठित अशा सामाजिक संस्थेतर्फे, संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र भाजपाचे राज्य प्रवक्ता अवधूत वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख ५१ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.




याचबरोबर ‘पुरुष’ नाटकाचे नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पुरुष’ नाटकाचे निर्माते संतोष काणेकर, श्रीकांत तटकरे तसेच दिग्दर्शक राजन ताम्हाणे कलाकार अविनाश नारकर, स्पृहा जोशी, अनुपमा ताकमोगे, नेहा परांजपे, निषाद भोईर, संतोष पैठणे, ऋषिकेश रत्नपारखी तसेच या नाटकाचे पुरस्कर्ते राजेश गाडगीळ यांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दादर येथील शिवाजी मंदिरात रंगलेल्या या कार्यक्रमाला चित्रपट व रंगभूमी क्षेत्रातील अनेक दिगजांसहित मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी यांनी केले.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री