न्यूझीलंडपुढे २५० धावांचे आव्हान

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील शेवटच्या साखळी सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने प्रभावी गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय फलंदाजांना वेसण घातली. यामुळे भारतीय संघ ५० षटकांत नऊ बाद २४९ धावा करू शकला. श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७९, हार्दिक पांड्याने ४५ आणि अक्षर पटेलने ४२ धावा केल्या. शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आघाडीचे फलंदाज अवघ्या ३० धावांत बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला. याचा फटका भारतीय संघाला बसला. याआधी भारत सलग १३ व्यांदा नाणेफेक हरला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया सलग दहाव्यांदा नाणेफेक हरली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतासाठी घातक ठरला.



शुभमन गिल दोन धावा करुन मॅट हेन्रीच्या चेंडूवर पायचीत झाला. रोहित शर्मा १५ धावा करुन जेमीसनच्या चेंडूवर विल यंगकडे झेल देऊन परतला. विराट कोहली ११ धावा करुन मॅट हेन्रीच्या चेंडूवर ग्रेन फिलिप्सकडे झेल देऊन परतला. अक्षर पटेल ४२ धावा करुन रचिन रविंद्रच्या चेंडूवर विल्यमसनकडे झेल देत तंबूत गेला. श्रेयस अय्यर ७९ धावा केल्यानंतर विल्यम ओरोर्कच्या चेंडूवर झेलबाद झाला. विल यंगने हा झेल घेतला. यष्टीरक्ष फलंदाज केएल राहुल २३ धावा करुन सँटनरच्या चेंडूवर लॅथमकडे झेल देऊन परतला. रविंद्र जडेजा १६ धावा केल्यावर मॅट हेन्रीच्या चेंडूवर विल्यमसनकडे झेल देऊन बाद झाला. हार्दिक पांड्याने ४५ धावा केल्या. तो मॅट हेन्रीच्या चेंडूवर रचिन रविंद्रकडे झेल देऊन तंबूत परतला. मोहम्मद शमी पाच धावा केल्यानंतर मॅट हेन्रीच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सकडे झेल देऊन बाद झाला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक पाच बळी घेतले. के. जेमीसन, विल्यम ओरोर्क, मिचेल सँटनर (कर्णधार) आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.



भारतीय संघ ५० षटकांत नऊ बाद २४९ धावा करू शकल्यामुळे न्यूझीलंडपुढे ५० षटकांत २५० धावा करण्याचे आव्हान आहे. भारत - न्यूझीलंड सामन्यातील विजेता संघ ऑस्ट्रेलिया विरोधात आणि पराभूत संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रविवार ९ मार्च रोजी होणार आहे.
Comments
Add Comment

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,