SEBI च्या माजी अध्यक्षांविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश

  68

मुंबई : विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईतील न्यायालयाने शेअर बाजारातील फसवणूक आणि नियामक उल्लंघनाच्या आरोपाखाली सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. नियामक त्रुटी आणि संगनमताचे प्रथमदर्शनी पुरावे आढळले आहेत. या प्रकरणी निःपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी एफआयआर नोंदवण्याचे निर्देश विशेष न्यायाधीश शशिकांत एकनाथराव बांगर यांनी दिले. न्यायालयाने तपासावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ३० दिवसांच्या आत अहवाल मागवला आहे.



शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखली जाईल आणि नियमांचे पालन केले जाईल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सेबीची आहे. पण सेबीच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केले. त्यांनी बाजारातील फेरफारला चालना दिली आणि निर्धारित निकषांची पूर्तता न करणाऱ्या कंपनीची लिस्टिंग करण्यास परवानगी देऊन कॉर्पोरेट फसवणुकीला चालना दिली. यामुळे आर्थिक फसवणूक, नियामक नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचार झाला; अशी तक्रार प्रसारमाध्यमातील एका प्रतिनिधीने केली. या तक्रारीआधारे केलेल्या प्राथमिक सुनावणीअंती विशेष न्यायाधीश शशिकांत एकनाथराव बांगर यांनी चौकशीसाठी एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले.
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही