Digital library : आयटीआयमध्ये सुरु होणार डिजिटल लायब्ररी

पुणे : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना उपयुक्त सुविधा निर्माण केली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून आयटीआयमध्ये डिजिटल लायब्ररी (Digital library) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.



कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य आणि वाचनाची आवड वृध्दिंगत होणे आवश्यक आहे. आधुनिक काळात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक ग्रंथालयांबरोबरच डिजिटल लायब्ररीची गरज निर्माण झाली. डिजिटल लायब्ररी विद्यार्थ्यांना कधीही आणि कुठूनही ऑनलाइन शैक्षणिक साहित्य वाचण्याची सुविधा देते. डिजिटल लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना एकाचवेळी अनेक संसाधनांचा वापर करता येतो, माहितीचे अद्ययावतीकरण शक्य होते, जागेची बचत होते, पुस्तकांच्या देखभालीचा खर्च कमी होतो असे अनेक फायदे आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विद्यार्थ्यांना डिजिटल साहित्य उपलब्ध करून देणे शक्य आहे.


या पार्श्वभूमीवर आयटीआयमधील डिजिटल लायब्ररी (Digital library) सुविधेचा सर्व विद्यार्थ्यांना होणारा फायदा विचारात घेऊन सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये डिजिटल लायब्ररी सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मुंबई, अमरावती येथील आयटीआयपासून सुरुवात योजनेअंतर्गत सुरुवातीला मुंबईतील नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अमरावती येथील संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे डिजिटल लायब्ररी सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी एकूण ९९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद