Digital library : आयटीआयमध्ये सुरु होणार डिजिटल लायब्ररी

पुणे : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना उपयुक्त सुविधा निर्माण केली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून आयटीआयमध्ये डिजिटल लायब्ररी (Digital library) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.



कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेताना विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य आणि वाचनाची आवड वृध्दिंगत होणे आवश्यक आहे. आधुनिक काळात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक ग्रंथालयांबरोबरच डिजिटल लायब्ररीची गरज निर्माण झाली. डिजिटल लायब्ररी विद्यार्थ्यांना कधीही आणि कुठूनही ऑनलाइन शैक्षणिक साहित्य वाचण्याची सुविधा देते. डिजिटल लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना एकाचवेळी अनेक संसाधनांचा वापर करता येतो, माहितीचे अद्ययावतीकरण शक्य होते, जागेची बचत होते, पुस्तकांच्या देखभालीचा खर्च कमी होतो असे अनेक फायदे आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून विद्यार्थ्यांना डिजिटल साहित्य उपलब्ध करून देणे शक्य आहे.


या पार्श्वभूमीवर आयटीआयमधील डिजिटल लायब्ररी (Digital library) सुविधेचा सर्व विद्यार्थ्यांना होणारा फायदा विचारात घेऊन सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये डिजिटल लायब्ररी सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मुंबई, अमरावती येथील आयटीआयपासून सुरुवात योजनेअंतर्गत सुरुवातीला मुंबईतील नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अमरावती येथील संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे डिजिटल लायब्ररी सुरू केल्या जाणार आहेत. त्यासाठी एकूण ९९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,