Cleanliness Drive : नारायणगाव परिसरात स्वच्छता अभियानातून काढला १४ टन कचरा!

जुन्नर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने नारायणगाव ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियानाचे (cleanliness drive) आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता अभियानाच्या आयोजन करण्यात आले होते. आपला परिसर स्वच्छ राहावा तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता यावी या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.



सकाळी ८ वाजून ३० मिनिटपासून प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नारायणगाव परिसरातील जुना पुणे नाशिक महामार्ग, पोलीस स्टेशन, कोल्हे मळा ते बस स्थानक, ओझर रोड ते पुनम हॉटेल रोड, नेवकर पुल, खोडद रस्ता अशा एकूण सहा हजार चौरस मीटर जागेचे तसेच २१ किलोमीटर दुतर्फा रस्त्यांची स्वच्छता केली. यावेळी साधारणपणे तीन टन ओला कचरा व १३ टन सुका कचरा जमा करण्यात आला. ग्रामपंचायत मार्फत पुरवण्यात आलेल्या व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आणलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून हा कचरा कचरा डेपोपर्यंत नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली.


या स्वच्छता अभियानाच्याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, उपसरपंच बाबु पाटे, पोलीस उपनिरिक्षक जगदिश पाटील, नारायणगांव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, तसेच नारायणगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक

Devendra Fadnavis : पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या महिनाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू मुंबई : "

Jalgaon : जळगावच्या वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ? शहरातील चार ठिकाणी उड्डाणपूल आणि अंडरपास प्रस्तावाला नितीन गडकरींचा हिरवा कंदील

Jalgaon : जळगावकरांसाठी वाहतुकीबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडीवर

Sunetra Pawar : आदिवासी हा विकासाचा लाभार्थी नव्हे, तर विकासाला दिशा देणारा समाज!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; ग्लोबल वॉर्मिगबाबतचा जीवनमंत्र आदिवासींनी शेकडो वर्षांपूर्वी दिला मुंबई :