AI camera : पालिकेच्या सर्व रुग्णालयांसह कार्यालयांमध्ये बसवणार 'एआय-कॅमरे'

मनपाच्या सुरक्षा दलाचा ५९ वा वर्धापन दिन साजरा


मुंबई : मुंबई पालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अर्थात ए आय कॅमेरा (AI camera) हे पथदर्शी प्रकल्प अंतर्गत मुंबई पालिकेच्या प्रमुख चार रूग्णालयात कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. तसेच प्रसुतिगृह आणि उपनगरीय रूग्णालये याठिकाणीदेखील कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रसुतिगृह आणि रूग्णालय या परिसरात येणाऱ्या व्यक्तींच्या चेहर्याची ओळख संबंधिचा तपशील तसेच परिसरात ये - जा करणार्या वाहनांची माहितीही मिळवणे शक्य होईल. पुढील टप्प्यात विभाग कार्यालये (वॉर्ड) अणि महानगरपालिकेच्या नाट्यगृह व जलतरण तलाव याठिकाणीदेखील अशाच प्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असल्याची माहिती प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी दिली.


मुंबई पालिकेच्या सुरक्षा दलाचा ५९ वा वर्धापन दिन शनिवारी १ मार्च २०२५ भांडुप संकुल स्थित सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्यासह विविध अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.



मुंबई पालिकेच्या आस्थापनांना सेवा देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम सुरक्षा दल चोखपणे बजावत आहे. सुरक्षेसारखी अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडणारे सुरक्षा दल अधिक अद्ययावत अणि बळकट करण्याकरिता तसेच सुरक्षा खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्याकरिता पालिका प्रशासन प्रयत्नशील राहील,अशी ग्वाही मुंबई पालिकेच्या उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी दिली.


सुरक्षा दलातील अधिकारी, कर्मचारी हे मुंबई महानगरपालिकेच्या सेवेस कायम तत्पर असतात. विविध बंदोबस्त त्यांनी उत्तम प्रकारे आणि कार्यक्षमतेने पार पाडले आहेत. सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांकरिता ई- मस्टर प्रणालीही लवकरच कार्यान्वित होणार आहे, असे चंदा जाधव यांनी नमुद केले.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.