वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे तब्बल ३६ तासांहून अधिक काळ प्रवासी अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेता वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे–वरळी सी लिंक तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याठिकाणी हेलिपॅड उभारावे, अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


या महत्त्वाच्या वाहतूक मार्गांवर अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने आणि प्रभावी प्रतिसाद देणे मोठे आव्हान ठरू शकते. विशेषतः कोस्टल रोड हा काही ठिकाणी भुयारी तर काही ठिकाणी समुद्रावरून जाणारा मार्ग असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवणे, सुरक्षा यंत्रणांची जलद हालचाल सुनिश्चित करणे तसेच आपत्कालीन सेवा वेळेत पोहोचवणे कठीण होऊ शकते, अशी चिंता शेलार यांनी व्यक्त केली आहे.


या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, सी लिंकजवळ हेलिपॅड उभारण्याची तातडीची गरज असल्याची मागणी शेलार यांनी केली आहे. या हेलिपॅडसाठी आवश्यक जागा उपलब्ध असून यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हेलिपॅडची गरज का?


हेलिपॅड उभारण्यात आल्यास कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने हलवणे शक्य होईल. तसेच लीलावती रुग्णालयासह परिसरातील अन्य प्रमुख रुग्णालयांपर्यंत जलद वैद्यकीय सेवा पोहोचवता येईल. यामुळे आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच अन्य यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी होऊन मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा अधिक मजबूत होईल, असेही आशिष शेलार यांनी नमूद केले आहे.

Comments
Add Comment

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे

महापालिकेच्यावतीने पाणी आणि अन्नाची शुद्धता तपासणी

अहवाल आता व्हॉट्सअॅप, ईमेलवर प्राप्त होणार मुंबई : पाणी आणि अन्न हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य घटक आहेत.

Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया

Ganesh Naik : महाराष्ट्राच्या वनहद्दीत पाच वर्षांत साडेतीन लाख झाडांवर कुऱ्हाड

सव्वा लाख झाडे सागवानाची; बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्याचे मोठे आव्हान मुंबई : निसर्गसंपन्न महाराष्ट्राच्या

Deputy Chief Minister Eknath Shinde : टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, : टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य

Mumbai Metro One : मुंबई मेट्रोत महिला सुरक्षा रक्षकाची सतर्कता; प्रवाशाकडून गांज्याची ९ पाकिटे जप्त, आरोपी अटकेत

मुंबई : मुंबई मेट्रो वनच्या (Mumbai Metro One) सुरक्षा व्यवस्थेने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. एअरपोर्ट