लग्न ठरल्यानंतरही संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती; तरुणीला लग्नाचे आमिष देऊन पाच वर्ष अत्याचार!

जळगाव : गेल्या पाच वर्षांपासून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. नंतर लग्नास नकार दिला. त्यानंतर तिचे दुस-या मुलाशी लग्न ठरलेले असतानाही तिला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. त्यास स्पष्ट नकार दिल्याने त्या तरुणाने तिच्या भावी पतीला याची माहिती दिल्याने तिचा विवाह देखील मोडला. हा धक्कादायक प्रकार चोपडा तालुक्यात उघडकीस आला असून याप्रकरणी तरुणीने तक्रार दिल्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरूणी राहायला असून तिचे पाच वर्षांपुर्वी संशयित आरोपी मनिष विजय पाटील रा. चोपडा याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला. त्यानंतर त्याने तरूणीशी लग्न करण्यास नकार दिला. ही घटना घडल्यानंतर मात्र तरूणीने कोणतीही तक्रार केली नाही.



त्यानंतर मनीष याने लग्नास नकार दिल्याने पीडित तरुणीचा विवाह ठरला होता. दुसरीकडे तरूणीचे लग्न ठरलेले असताना देखील त्याने पिडीत तरूणीवर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावर तरूणीने संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला म्हणून तिचे ठरलेले लग्न मोडण्यासाठी तिच्या भावी पतीला संशयित आरोपी मनीष पाटील याने बोलावून तिचे लग्न मोडले.


त्यामुळे या त्रासाला कंटाळून शेवटी पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिल्यावरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध