Passport : पासपोर्टसाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पासपोर्ट (Passport) बनवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. यासाठी, पासपोर्ट नियम १९८० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्यांसाठी जन्मतारखेसाठी एकमेव कागदपत्र म्हणजे जन्म आणि मृत्यु निबंधक, महानगरपालिका किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र असेल.


परराष्ट्र मंत्रालयाने २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले होते की, पासपोर्ट कायदा १९६७ मधील कलम २४ च्या तरतुदींनुसार पासपोर्ट (Passport) नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. पासपोर्ट सुधारणा नियम २०२५ अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून लागू होतील. त्यानुसार, १ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी, जन्मतारखेचा पुरावा म्हणून फक्त जन्म प्रमाणपत्र वैध असेल, जे जन्म आणि मृत्यु नोंदणी कायदा, १९६९ अंतर्गत 'जन्म आणि मृत्यु निबंधक किंवा महापालिका किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाने जारी केले आहे. त्याच वेळी, पासपोर्ट नियमांमध्ये सुधारणा झाल्यानंतर, १ ऑक्टोबर २०२३ पूर्वी जन्मलेले लोक जन्मतारखेचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रे सादर करू शकतात. यामध्ये अर्जदाराच्या जन्मतारखेसह मान्यताप्राप्त शाळा किंवा मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळांनी जारी केलेले हस्तांतरण किंवा मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रे समाविष्ट आहेत.



याशिवाय, कायमस्वरूपी खाते क्रमांक (आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड); सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डची किंवा निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन ऑर्डरची प्रत, कोणत्याही राज्यातील वाहतूक विभागाने जारी केलेला ड्रायव्हिंग लायसन्स; भारतीय निवडणूक आयोगाने दिलेले निवडणूक छायाचित्र ओळखपत्र; किंवा भारतीय जीवन विमा महामंडळे किंवा सार्वजनिक कंपन्यांनी जारी केलेले पॉलिसी बाँड यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून