'देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल'

पालघर : वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊन म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.





वाढवण बंदराच्या विकास प्रकल्पाची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राणे म्हणाले, वाढवण बंदरामध्ये महाराष्ट्र शासनाचा २६ टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाचा केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.







कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्यामार्फत स्थानिकांना विविध क्षेत्रातील कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

वाढवण बंदरामुळे मोठा रोजगार निर्माण होणार आहे तो पालघर जिल्हयातील स्थानिकांना मिळायला पाहिजे. स्थानिक मच्छिमारांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांची भावी पिढी या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभी राहिल व आर्थिक सक्षम होइल. त्याबाबत संबंधितांना प्रशिक्षण देऊन वाढवण बंदराच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचा विकास आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार असून यासाठी प्रकल्प उभारणीच्या कामात संबंधित अधिकारी यांनी जलदगतीने काम करावे, अशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बंदर विकास विभागामार्फत होणारी गुंतवणूक व त्याची परिस्थिती काय आहे. प्रकल्पाची कामे कुठपर्यंत आली आहेत. याचा आढावा राणे यांनी घेतला.
Comments
Add Comment

Mumbai Birth Certificate Scam : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी SIT तपास करणार

मुंबई : मुंबईतील बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी एसआयटी तपास करणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे

New Syllabus : शैक्षणिक वर्ष २०२६ - २७ पासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवा अभ्यासक्रम

मुंबई : इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या

Thorium : थोरियम आधारित अणुऊर्जा तंत्रज्ञान महाराष्ट्रासाठी ठरणार गेम चेंजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाणार प्रकल्पामुळे महाराष्ट्र १० वर्षे पुढे गेला असता मुंबई : महाराष्ट्राच्या

Central Railway : मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जलद कारवाईमुळे कल्याण स्टेशनवर जीव वाचला

 मुंबई :  मध्य रेल्वेच्या सतर्क स्टेशन कर्मचाऱ्यांनी आज कल्याण स्टेशनवर एका संभाव्य दुर्घटनेला यशस्वीरित्या

Divya Dakshin Yatra : IRCTC सोबत भारताच्या आध्यात्मिक वारशाचा अनुभव; भारत गौरव पर्यटन ट्रेन 26 मे 2026 रोजी नागपूरहून प्रस्थान करणार

मुंबई : Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) तर्फे 11 रात्री / 12 दिवसांची विशेष “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटन ट्रेनद्वारे

Tourism Minister Shambhuraj Desai : अजिंठा परिसराचा सर्वांगीण पर्यटन विकास साधणार

सिल्लोड-सोयगावमधील पर्यटन प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबईत आढावा बैठक मुंबई : जागतिक स्तरावर पर्यटनदृष्ट्या