पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा हवा म्हणत टीसीएसच्या मॅनेजरने केली आत्महत्या

आग्रा : आई वडील आणि लाडक्या अक्कूची माफी मागत, पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा हवा अशी मागणी करत; टीसीएसच्या मॅनेजरने आत्महत्या केली. पंख्याच्या मदतीने त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्याआधी मानव शर्माने सुमारे सात मिनिटांचा एक व्हिडीओ केला. या व्हिडीओद्वारे स्वतःची बाजू मांडून मानवने टोकाचे पाऊल उचलले.





मूळचा उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारा मानव नोकरीच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास होता. तो टीसीएसमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होता. नोकरीत स्थिरस्थावर होता म्हणून त्याने लग्नाचा निर्णय घेतला. त्याचे ३० जानेवारी २०२४ रोजी लग्न झाले. लग्नानंतर तो आणि त्याची पत्नी मुंबईत वास्तव्यास होते. मुंबईत पती - पत्नीचे वारंवार वाद होऊ लागले. पत्नी मानवला आणि त्याच्या घरच्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची धमकी देत होती. वारंवार बॉयफ्रेंड सोबत राहण्याची भाषा करू लागली होती. अखेर मानव सुटी घेऊन पत्नीसह आग्रा येथे आला. ज्या दिवशी घरी आला त्याच दिवशी थोड्या वेळाने तो पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेला. मानवने पत्नीला २३ फेब्रुवारी रोजी माहेर सोडले. यानंतर २४ फेब्रुवारी रोजी मानवने आत्महत्या केली.



मुलाने आत्महत्या केल्याचे समजल्यापासून वायुदलातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांना जबर धक्का बसला आहे. पत्नीच्या जाचाला वैतागून माझ्या मुलाने, मानव शर्माने आत्महत्या केली; असे त्याचे वडील नरेंद्र शर्मा म्हणाले. मला न्याय हवा आहे, अशी मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत