पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा हवा म्हणत टीसीएसच्या मॅनेजरने केली आत्महत्या

  90

आग्रा : आई वडील आणि लाडक्या अक्कूची माफी मागत, पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा हवा अशी मागणी करत; टीसीएसच्या मॅनेजरने आत्महत्या केली. पंख्याच्या मदतीने त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्याआधी मानव शर्माने सुमारे सात मिनिटांचा एक व्हिडीओ केला. या व्हिडीओद्वारे स्वतःची बाजू मांडून मानवने टोकाचे पाऊल उचलले.





मूळचा उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारा मानव नोकरीच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास होता. तो टीसीएसमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होता. नोकरीत स्थिरस्थावर होता म्हणून त्याने लग्नाचा निर्णय घेतला. त्याचे ३० जानेवारी २०२४ रोजी लग्न झाले. लग्नानंतर तो आणि त्याची पत्नी मुंबईत वास्तव्यास होते. मुंबईत पती - पत्नीचे वारंवार वाद होऊ लागले. पत्नी मानवला आणि त्याच्या घरच्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची धमकी देत होती. वारंवार बॉयफ्रेंड सोबत राहण्याची भाषा करू लागली होती. अखेर मानव सुटी घेऊन पत्नीसह आग्रा येथे आला. ज्या दिवशी घरी आला त्याच दिवशी थोड्या वेळाने तो पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेला. मानवने पत्नीला २३ फेब्रुवारी रोजी माहेर सोडले. यानंतर २४ फेब्रुवारी रोजी मानवने आत्महत्या केली.



मुलाने आत्महत्या केल्याचे समजल्यापासून वायुदलातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांना जबर धक्का बसला आहे. पत्नीच्या जाचाला वैतागून माझ्या मुलाने, मानव शर्माने आत्महत्या केली; असे त्याचे वडील नरेंद्र शर्मा म्हणाले. मला न्याय हवा आहे, अशी मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत