पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा हवा म्हणत टीसीएसच्या मॅनेजरने केली आत्महत्या

आग्रा : आई वडील आणि लाडक्या अक्कूची माफी मागत, पुरुषांच्या संरक्षणासाठी कायदा हवा अशी मागणी करत; टीसीएसच्या मॅनेजरने आत्महत्या केली. पंख्याच्या मदतीने त्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्याआधी मानव शर्माने सुमारे सात मिनिटांचा एक व्हिडीओ केला. या व्हिडीओद्वारे स्वतःची बाजू मांडून मानवने टोकाचे पाऊल उचलले.





मूळचा उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारा मानव नोकरीच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास होता. तो टीसीएसमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होता. नोकरीत स्थिरस्थावर होता म्हणून त्याने लग्नाचा निर्णय घेतला. त्याचे ३० जानेवारी २०२४ रोजी लग्न झाले. लग्नानंतर तो आणि त्याची पत्नी मुंबईत वास्तव्यास होते. मुंबईत पती - पत्नीचे वारंवार वाद होऊ लागले. पत्नी मानवला आणि त्याच्या घरच्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची धमकी देत होती. वारंवार बॉयफ्रेंड सोबत राहण्याची भाषा करू लागली होती. अखेर मानव सुटी घेऊन पत्नीसह आग्रा येथे आला. ज्या दिवशी घरी आला त्याच दिवशी थोड्या वेळाने तो पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेला. मानवने पत्नीला २३ फेब्रुवारी रोजी माहेर सोडले. यानंतर २४ फेब्रुवारी रोजी मानवने आत्महत्या केली.



मुलाने आत्महत्या केल्याचे समजल्यापासून वायुदलातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांना जबर धक्का बसला आहे. पत्नीच्या जाचाला वैतागून माझ्या मुलाने, मानव शर्माने आत्महत्या केली; असे त्याचे वडील नरेंद्र शर्मा म्हणाले. मला न्याय हवा आहे, अशी मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.