…तर भारत-अफगाणिस्तान यांच्यात रंगेल सेमीफायनल!

  50

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने इंग्लंडला हरवत मोठा उलटफेर केला. या मुळे इंग्लंडच्या संघाला सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले. तर अफगाणिस्तानने सेमीफायनलमधील आपली दावेदारी कायम ठेवली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज अफगाणिस्तानचा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यावर चाहत्यांचे लक्ष आहे.



अफगाणिस्तानशी होणार भारताचा मुकाबला?


शुक्रवारी जर अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील. अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेत आहे. अशातच जर त्यांनी सेमीफायनलमध्ये एंट्री केली तर त्यांच्यासाठी हा मोठा क्षण असेल. तसेच सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानची टक्कर भारताशी होऊ शकते. कसे ते जाणून घ्या...


जर अफगाणिस्तानचा संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर राहतो . तसेच भारत आपल्या ग्रुपमध्ये टॉपवर असेल तर दोघांमद्ये सेमीफायनलचा सामना रंगू शकतो. जर भारतीय संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर असेल आणि अफगाणिस्तानचा संघ ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर असेल तर दोघांमध्ये सेमीफायनलचा सामना रंगेल.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी