Bell's Palsy Ptient : सिव्हील रुग्णालयात बेल्स पाल्सी रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलले!

  37

चेहऱ्याच्या पक्षघाताने त्रस्त पाच रुग्णांवर फिजिओथेरपीचे यशस्वी उपचार


ठाणे : पक्षाघाताचा झटका आल्यावर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. या संकटातून आता बरे होणार नाही अशी भावना असली, तरी वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणे खूप महत्वाचे ठरत आहे. ठाणे सिव्हील रुग्णालयात चेहऱ्याचा पक्षघाताने (बेल्स पाल्सी) त्रस्त झालेल्या पाच रुग्णांवर चांगले उपचार आणि फिजिओथेरपीद्वारे योग्य ट्रीटमेंट देऊन चेहऱ्यावर पूर्वीसारखे हसू उमटले आहे. आता कधी कोणाला कोणता आजार जडेल याचा नेम नाही. त्यामुळे एखाद्या रोगाची लक्षणे दिसल्यावर तात्काळ उपचार करणे हेच महत्वाचे ठेरत असून, सध्या चेहऱ्याचा पक्षाघात (बेल्स पाल्सी) झालेले अनेक रुग्ण बघायला मिळत आहेत. मुळात पक्षाघात झाल्यावर पुढे आपले कसे होणार ही चिंता सतावते. आपण दुसऱ्यावर अवलंबून रहाणार या विवंचनेत असणाऱ्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालय आशेचे किरण ठरत आहे. गेल्या दोन महिन्यात चेहऱ्याचा पक्षाघत (बेल्स पाल्सी) झालेल्या पाच रुग्णांवर जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. धिरज माहंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाले असल्याची माहिती फिजिओथेरपीस्ट डॉ. ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली.



विषाणू संसर्ग, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती मधुमेह व रक्तदाब, आपघातामुळे आदी कारणांनी बेल्स पाल्सी कोणत्याही वयोगटातील स्त्री व पुरुषानां होऊ शकतो. चेहऱ्याच्या मज्जातंतूचा (फेशिअल नव्ह ) मेंदूमधून निघून कानाच्या मागुन आपल्या चेहऱ्याला पाच भागात विभागुन चेहऱ्याचे हावभाव , डोळे व तोंडाच्या हालचाली नियंत्रणात ठेवते . बेल्स पाल्सी आजारात चेहऱ्याच्या मज्जातंतूंला होणाऱ्या सुजेमुळे चेहऱ्याचा लकवा होत असल्याचे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. सुरभी लुटे म्हणाल्या.
कोट


एखाद्याला चेहऱ्याचा पक्षघात (बेल्स पाल्सी) झाला तरी घाबरून जायचे कारण नाही वैद्यकीय उपचार व फिजिओथेरपीने साधारणपणे एक ते तीन महिन्यात कमी अधिक कालावधीत बरा होतो. रुग्णालयात च इलेक्ट्रीकल स्टिम्युलेशन देवून स्नायूंचे आकुंचन घडवून आणले जाते. सोबत घरी कपाळावर आठ्या पाडणे, डोळ्यांची उघड झाप करणे, गालाचा फुगा करणे, मेणबत्ती विझवणे, शिट्टी वाजवणे आदींनी उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
- डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हील रुग्णालय ठाणे)
Comments
Add Comment

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै

केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - अजित पवार

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी

थकलेल्या वारकऱ्यांचे पाय दाबून आदेश बांदेकर यांनी केली सेवा; हृषिकेश आणि सारंगही होते सोबत

मुंबई: अभिनेते आणि निर्माते आदेश बांदेकर यांनी 'माऊली महाराष्ट्राची' या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूर

चंद्रपूर शहरातील नाल्यावर उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई : चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्यावर पूर संरक्षक भिंतीचे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काम