Bell's Palsy Ptient : सिव्हील रुग्णालयात बेल्स पाल्सी रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलले!

  31

चेहऱ्याच्या पक्षघाताने त्रस्त पाच रुग्णांवर फिजिओथेरपीचे यशस्वी उपचार


ठाणे : पक्षाघाताचा झटका आल्यावर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. या संकटातून आता बरे होणार नाही अशी भावना असली, तरी वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणे खूप महत्वाचे ठरत आहे. ठाणे सिव्हील रुग्णालयात चेहऱ्याचा पक्षघाताने (बेल्स पाल्सी) त्रस्त झालेल्या पाच रुग्णांवर चांगले उपचार आणि फिजिओथेरपीद्वारे योग्य ट्रीटमेंट देऊन चेहऱ्यावर पूर्वीसारखे हसू उमटले आहे. आता कधी कोणाला कोणता आजार जडेल याचा नेम नाही. त्यामुळे एखाद्या रोगाची लक्षणे दिसल्यावर तात्काळ उपचार करणे हेच महत्वाचे ठेरत असून, सध्या चेहऱ्याचा पक्षाघात (बेल्स पाल्सी) झालेले अनेक रुग्ण बघायला मिळत आहेत. मुळात पक्षाघात झाल्यावर पुढे आपले कसे होणार ही चिंता सतावते. आपण दुसऱ्यावर अवलंबून रहाणार या विवंचनेत असणाऱ्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालय आशेचे किरण ठरत आहे. गेल्या दोन महिन्यात चेहऱ्याचा पक्षाघत (बेल्स पाल्सी) झालेल्या पाच रुग्णांवर जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. धिरज माहंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाले असल्याची माहिती फिजिओथेरपीस्ट डॉ. ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली.



विषाणू संसर्ग, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती मधुमेह व रक्तदाब, आपघातामुळे आदी कारणांनी बेल्स पाल्सी कोणत्याही वयोगटातील स्त्री व पुरुषानां होऊ शकतो. चेहऱ्याच्या मज्जातंतूचा (फेशिअल नव्ह ) मेंदूमधून निघून कानाच्या मागुन आपल्या चेहऱ्याला पाच भागात विभागुन चेहऱ्याचे हावभाव , डोळे व तोंडाच्या हालचाली नियंत्रणात ठेवते . बेल्स पाल्सी आजारात चेहऱ्याच्या मज्जातंतूंला होणाऱ्या सुजेमुळे चेहऱ्याचा लकवा होत असल्याचे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. सुरभी लुटे म्हणाल्या.
कोट


एखाद्याला चेहऱ्याचा पक्षघात (बेल्स पाल्सी) झाला तरी घाबरून जायचे कारण नाही वैद्यकीय उपचार व फिजिओथेरपीने साधारणपणे एक ते तीन महिन्यात कमी अधिक कालावधीत बरा होतो. रुग्णालयात च इलेक्ट्रीकल स्टिम्युलेशन देवून स्नायूंचे आकुंचन घडवून आणले जाते. सोबत घरी कपाळावर आठ्या पाडणे, डोळ्यांची उघड झाप करणे, गालाचा फुगा करणे, मेणबत्ती विझवणे, शिट्टी वाजवणे आदींनी उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
- डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हील रुग्णालय ठाणे)
Comments
Add Comment

क्रिकेट ऑस्ट्रेलिया करणार रोहित-विराटचा सन्मान ?

नवी दिल्ली : रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता भारताच्या या दोन

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

वट पौर्णिमा २०२५ : वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रत जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी