Bell's Palsy Ptient : सिव्हील रुग्णालयात बेल्स पाल्सी रुग्णांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलले!

चेहऱ्याच्या पक्षघाताने त्रस्त पाच रुग्णांवर फिजिओथेरपीचे यशस्वी उपचार


ठाणे : पक्षाघाताचा झटका आल्यावर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. या संकटातून आता बरे होणार नाही अशी भावना असली, तरी वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणे खूप महत्वाचे ठरत आहे. ठाणे सिव्हील रुग्णालयात चेहऱ्याचा पक्षघाताने (बेल्स पाल्सी) त्रस्त झालेल्या पाच रुग्णांवर चांगले उपचार आणि फिजिओथेरपीद्वारे योग्य ट्रीटमेंट देऊन चेहऱ्यावर पूर्वीसारखे हसू उमटले आहे. आता कधी कोणाला कोणता आजार जडेल याचा नेम नाही. त्यामुळे एखाद्या रोगाची लक्षणे दिसल्यावर तात्काळ उपचार करणे हेच महत्वाचे ठेरत असून, सध्या चेहऱ्याचा पक्षाघात (बेल्स पाल्सी) झालेले अनेक रुग्ण बघायला मिळत आहेत. मुळात पक्षाघात झाल्यावर पुढे आपले कसे होणार ही चिंता सतावते. आपण दुसऱ्यावर अवलंबून रहाणार या विवंचनेत असणाऱ्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालय आशेचे किरण ठरत आहे. गेल्या दोन महिन्यात चेहऱ्याचा पक्षाघत (बेल्स पाल्सी) झालेल्या पाच रुग्णांवर जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. धिरज माहंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाले असल्याची माहिती फिजिओथेरपीस्ट डॉ. ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली.



विषाणू संसर्ग, कमकुवत रोगप्रतिकार शक्ती मधुमेह व रक्तदाब, आपघातामुळे आदी कारणांनी बेल्स पाल्सी कोणत्याही वयोगटातील स्त्री व पुरुषानां होऊ शकतो. चेहऱ्याच्या मज्जातंतूचा (फेशिअल नव्ह ) मेंदूमधून निघून कानाच्या मागुन आपल्या चेहऱ्याला पाच भागात विभागुन चेहऱ्याचे हावभाव , डोळे व तोंडाच्या हालचाली नियंत्रणात ठेवते . बेल्स पाल्सी आजारात चेहऱ्याच्या मज्जातंतूंला होणाऱ्या सुजेमुळे चेहऱ्याचा लकवा होत असल्याचे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. सुरभी लुटे म्हणाल्या.
कोट


एखाद्याला चेहऱ्याचा पक्षघात (बेल्स पाल्सी) झाला तरी घाबरून जायचे कारण नाही वैद्यकीय उपचार व फिजिओथेरपीने साधारणपणे एक ते तीन महिन्यात कमी अधिक कालावधीत बरा होतो. रुग्णालयात च इलेक्ट्रीकल स्टिम्युलेशन देवून स्नायूंचे आकुंचन घडवून आणले जाते. सोबत घरी कपाळावर आठ्या पाडणे, डोळ्यांची उघड झाप करणे, गालाचा फुगा करणे, मेणबत्ती विझवणे, शिट्टी वाजवणे आदींनी उपचारांनी रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
- डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हील रुग्णालय ठाणे)
Comments
Add Comment

Cancer Fighting Food In Ayurveda: आयुर्वेदातील कोणते पदार्थ कर्करोगावर नियंत्रण ठेवू शकतात, जाणून घ्या

मुंबई: आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ दोषांचे संतुलन राखून कर्करोगासारख्या आजारावर लक्षणीय नियंत्रण मिळवता येते.

मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित

मृणाल ठाकूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित

Mrunal Thakur : दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवलेली आणि तितकीच मराठमोळ्या चित्रपटांहून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी

अवघ्या २ आठवड्यात मोडले सर्व मोठे रेकॉर्ड; जगभरात होते 'या' सिरीजची चर्चा..

Netflix Series : बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी याच्या वेबसिरीजने सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. २०२६ ची सुरूवात

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

धावत्या लोकलमधून प्रवाशाने वाशीच्या खाडीत मारली उडी

वाशी : धावत्या लोकलमधून प्रवाशाने वाशीच्या खाडीत उडी मारली. ही धक्कादायक घटना नवी मुंबईतील वाशी खाडी परिसरात