Badrinath Glacier Collapses : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळडा! ५७ जण अडकले

  47

देहराडून : उत्तराखंडमधील चमोली येथील माना गावात आज शुक्रवारी हिमकडा तुटल्याने मोठा अपघात (Badrinath Glacier Collapses) झाला आहे. या घटनेत ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले होते, मात्र यातील १६ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही ४१ कामगार बर्फाखाली दबलेले आहेत. या ४१ जणांचा शोध सुरू आहे. अपघातानंतर प्रशासन आणि बीआरओ टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. सध्या आयटीबीपी आणि गढवाल स्काउटची टीम बचाव कार्यात व्यस्त आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी एका खाजगी कंत्राटदाराचे कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत होते. हे सर्वजण बीआरओच्या कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. जेव्हा हिमस्खलन झाले तेव्हा सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. त्यापैकी काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र ५७ कामगार बर्फाखाली अडकले होते. यातील १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बीआरओ टीमने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, चमोली बद्रीनाथ धाममधील माना गावाजवळील एक हिमकडा कोसळल्यामुळे ५७ कामगार अडकले आहे. तर १६ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. उर्वरित ४१ कामगारांचा शोध सुरू आहे. दरम्यान, चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, दळणवळण व्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत असल्याने योग्य माहिती मिळत नाही.

चमोलीच्या वरच्या भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान खात्याने आजसाठी (दि. २८) आधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. ३२०० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भागातही बर्फवृष्टीची शक्यता होती. हिमस्खलनाची भीतीही व्यक्त करण्यात आली. आता बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महामार्गाजवळ हिमकडा कोसळला आहे. उत्तराखंडमधील माना गाव भारत आणि चीनच्या सीमेवर आहे. येथे एक आर्मी बेस कॅम्प आहे. म्हणून, सैन्य प्रथम बचाव कार्यात गुंतलं आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके रवाना करण्यात आली आहेत. हिमकडा कोसळल्यामुळे बीआरओ पथकांनी बचावकार्यही सुरू केलं आहे.


Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )