अमित शाहांनी घेतली दिल्लीच्या सुरक्षेची समन्वय बैठक

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेबोबत समन्वय बैठक आज, शुक्रवारी पार पडली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या बैठकीला उपस्थित होत्या. या बैठकीत कायदा सुव्यवस्थेसह रस्त्यांच्या समस्या आणि इतरही मुद्द्यांवर चर्चा झाली.

बैठकीनंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांमध्ये समन्वयाची आवश्यकता असलेल्या विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. ज्याप्रमाणे इतर राज्यांमध्ये डबल इंजिन सरकार काम करत आहे, त्याचप्रमाणे दिल्लीतही डबल इंजिन सरकारचा एक वेगळा चेहरा दिसेल, सर्व समस्या समन्वयाने सोडवल्या जातील. दिल्लीतील लोकांना 100 टक्के सुरक्षा पुरवली जाईल. अशा समन्वय बैठका मासिक बैठकांच्या स्वरूपात असतील आणि आम्ही दिल्लीला चांगल्या सुविधा देऊ, असेही त्यांनी सांगितले.


यावेळी आम आदमी पक्षावर टीका करताना गुप्ता म्हणाल्या की, जेव्हा जेव्हा केंद्र सरकारने दिल्लीला मोठ्या समस्या निर्माण करणाऱ्या छोट्या मुद्द्यांवर तपशील मागितले तेव्हा मागील राज्य सरकारने ते देण्यासाठी कधीही सहकार्य केले नाही. तर बैठकीत चर्चेत आलेल्या विषयांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाल्या की, शांतता समित्या, पोलिस स्टेशन पातळीवर जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना यावर चर्चा झाली. महिलांच्या सुरक्षेवरही चर्चा झाली. आम्ही लवकरच यावर सविस्तर धोरणे बनवण्यावर काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च