प्रयागराज : मुख्यमंत्र्यांनी केली घाटांची स्वच्छता

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे तब्बल ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभाचा बुधवारी (२६ फेब्रुवारी) समारोप झाला. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज, गुरुवारी त्रिवेणी संगमावर पोहोचले. योगी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अरैल घाटावर स्वच्छता केली. सर्वांनी गंगेतील कचरा बाहेर काढला. गंगेची पूजा केली. तसेच गंगा पंडालमध्ये पोलिस, स्वच्छता कामगार आणि नाविकांचा सन्मान केला.

योगी आणि इतर मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आजही अनेक रस्ते बॅरिकेडिंग केले आहेत. जत्रेच्या परिसरातील पार्किंगमध्ये वाहने पार्क करण्यात आली होती. महाकुंभाचे शेवटचे स्नान बुधवारी महाशिवरात्रीला झाले. गेल्या १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण महाकुंभात ६६ कोटी भाविकांनी स्नान केले.



हा आकडा अमेरिकेच्या लोकसंख्येच्या (सुमारे ३४ कोटी) दुप्पट आहे. संगमात स्नान करणाऱ्यांची ही संख्या १९३ देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. महाकुंभाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येपेक्षा फक्त भारत आणि चीनची लोकसंख्या जास्त आहे. योगी सरकारने दावा केला की जगातील निम्म्या हिंदू लोकसंख्येइतके लोक येथे आले आहेत.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली