प्रयागराज : मुख्यमंत्र्यांनी केली घाटांची स्वच्छता

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे तब्बल ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभाचा बुधवारी (२६ फेब्रुवारी) समारोप झाला. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज, गुरुवारी त्रिवेणी संगमावर पोहोचले. योगी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अरैल घाटावर स्वच्छता केली. सर्वांनी गंगेतील कचरा बाहेर काढला. गंगेची पूजा केली. तसेच गंगा पंडालमध्ये पोलिस, स्वच्छता कामगार आणि नाविकांचा सन्मान केला.

योगी आणि इतर मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आजही अनेक रस्ते बॅरिकेडिंग केले आहेत. जत्रेच्या परिसरातील पार्किंगमध्ये वाहने पार्क करण्यात आली होती. महाकुंभाचे शेवटचे स्नान बुधवारी महाशिवरात्रीला झाले. गेल्या १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण महाकुंभात ६६ कोटी भाविकांनी स्नान केले.



हा आकडा अमेरिकेच्या लोकसंख्येच्या (सुमारे ३४ कोटी) दुप्पट आहे. संगमात स्नान करणाऱ्यांची ही संख्या १९३ देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. महाकुंभाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येपेक्षा फक्त भारत आणि चीनची लोकसंख्या जास्त आहे. योगी सरकारने दावा केला की जगातील निम्म्या हिंदू लोकसंख्येइतके लोक येथे आले आहेत.

Comments
Add Comment

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या

Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या