प्रयागराज : मुख्यमंत्र्यांनी केली घाटांची स्वच्छता

  66

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे तब्बल ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभाचा बुधवारी (२६ फेब्रुवारी) समारोप झाला. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज, गुरुवारी त्रिवेणी संगमावर पोहोचले. योगी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अरैल घाटावर स्वच्छता केली. सर्वांनी गंगेतील कचरा बाहेर काढला. गंगेची पूजा केली. तसेच गंगा पंडालमध्ये पोलिस, स्वच्छता कामगार आणि नाविकांचा सन्मान केला.

योगी आणि इतर मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आजही अनेक रस्ते बॅरिकेडिंग केले आहेत. जत्रेच्या परिसरातील पार्किंगमध्ये वाहने पार्क करण्यात आली होती. महाकुंभाचे शेवटचे स्नान बुधवारी महाशिवरात्रीला झाले. गेल्या १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण महाकुंभात ६६ कोटी भाविकांनी स्नान केले.



हा आकडा अमेरिकेच्या लोकसंख्येच्या (सुमारे ३४ कोटी) दुप्पट आहे. संगमात स्नान करणाऱ्यांची ही संख्या १९३ देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. महाकुंभाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येपेक्षा फक्त भारत आणि चीनची लोकसंख्या जास्त आहे. योगी सरकारने दावा केला की जगातील निम्म्या हिंदू लोकसंख्येइतके लोक येथे आले आहेत.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या