म्हाडा आता वृद्धांसाठी बांधणार वृद्धाश्रम

  80

पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाण्यापासून सुरुवात


मुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता वृद्धांसाठी अद्ययावत सुविधा असणारे वृद्धाश्रम बांधणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे गरजू आणि निराधार वृद्धांना हक्काचा आधार मिळणार आहे.



म्हाडाने एमएमआर ग्रोथ हब या प्रकल्पांतर्गत मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून म्हाडाचे मुंबई मंडळ आणि कोकण मंडळ वृद्धाश्रम उभारण्याची तयारी करीत आहे. मुंबईत अंधेरीतील आराम नगर येथे तर ठाण्यात माजीवाड्यातील विवेकानंद नगर अद्ययावत वृद्धाश्रम उभारण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय भविष्यात पुणे, नागपूर, नाशिक मंडळातर्फे देखील वृद्धाश्रम उभारण्यात येणार आहे. याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून वृद्धाश्रमात काय सोयीसुविधा असाव्यात या सर्व बाबींचा विचार करून याची रुपरेखा निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.


नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे


वृद्धाश्रमासह नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी वसतिगृहे उभारण्याचे देखील म्हाडाचे नियोजन आहे. मुंबई उपनगरात १० वसतिगृहे उभारण्यात येणार असून जागेचा शोध सुरू आहे, तर ठाण्यातील माजीवाडा येथे महिलांसाठी एक वसतिगृह उभारण्याचे प्रस्तावित असून या वसतिगृहात एकाच वेळी २०० महिलांच्या निवासाची व्यवस्था होणार आहे

Comments
Add Comment

राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक