मिठी नदी खालील मेट्रो चाचणीला सुरुवात

धारावी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यान चाचण्यांना सुरुवात


मुंबई (प्रतिनिधी): मुंबईतील पहिला भुयारी मेट्रो मार्ग असलेल्या मेट्रो 'अॅक्वा लाइन-३' चा पुढील टप्पा लवकरच सुरु होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) माध्यमातून काम सुरु असलेल्या कुलाबा- वांद्रे- सीप्झ मार्गावरील मेट्रोचा एक टप्पा ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करुन सुरु करण्यात आला.


बीकेसी मेट्रो स्थानक ते आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकादरम्यानचा टप्पा सुरु झाल्यानंतर आता पुढील टप्प्यातील सहा स्थानकांची यशस्वीपणे चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या चाचणीमध्ये मिठी नदीखालील टप्प्यातही मेट्रोने सुरक्षित प्रवास केला आहे. या चाचणीचा म्हणजेच मिठी नदी खालून मेट्रो धावत असल्याचा व्हिडीओ मेट्रोच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. धारावी ते आचार्य अत्रे चौक या मेट्रो स्थानकादरम्यान (वरळी) मेट्रो गाडीची चाचणी करण्यात आली.


मेट्रो 'अॅक्वा लाइन ३ 'वरील मिठी नदीच्या खालून जाणाऱ्या मार्गावर चाचणी पूर्ण करण्यात आल्याचा व्हिडीओ मुंबई मेट्रो ३ च्या हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा टप्पा धारावी ते आचार्य अत्रे चौक या स्थानकांदरम्यान असून या टप्प्याचे एकूण अंतर ९.७७ किलोमीटर इतके आहे. या अंतरामध्ये एकूण सहा स्थानकांवर चाचणी घेण्यात आली आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणी आणि सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर मार्च २०२५ पर्यंत हा मार्ग सर्व सामान्यांसाठी खुला होणार आहे.बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या सहा स्थानकांमध्ये धारावी, सीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश आहे.


कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिका लोकार्पणानंतर प्रवाशांच्या सेवेत अंशत: दाखल झाली. भुयारी मेट्रो मार्गिकेवरील १२.५ किमीचा पहिला टप्पा सप्टेंबरपासूनच सेवेत दाखल झाला आहे. या मार्गावर १० स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी ९ स्थानके भूमिगत आहेत. याच मार्गावरील आरे येथे ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहे. याच मार्गावरील पुढल्या टप्प्यातील चाचणीचा व्हिडीओ मेट्रोने शेअर केला आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी दर साडेसहा मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येत आहेत. या प्रत्येक फेरीमध्ये अडीच हजार प्रवासी एका वेळेला प्रवास करतील, अशी अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केलेली. मात्र या मेट्रोला म्हणावा तसा प्रतिसाद मिळलेला नाही. आता दुसऱ्या टप्प्यात वरळीसारख्या महत्त्वाच्या भागात सेवा सुरु असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद या सेवेला मिळेल आणि खऱ्या अर्थाने लोकल ट्रेनला पर्याय उपलब्ध होईल असे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या