Navi Mumbai Airport : नवी मुंबईकरांसाठी गुडन्यूज! विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर

नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai Airport) काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हे विमानतळ प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे. सोमवारी संयुक्त पथकाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली असून विमानतळ उद्घाटनाची तारीख देखील जारी केली आहे.



DGCA च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "मूल्यांकनादरम्यान, आम्हाला विमानतळ ऑपरेटरने कळवले की ते ५ मार्चपर्यंत सर्व आवश्यक असणारी परवानगी मिळविण्यासाठी अर्ज करतील". या सर्व तपासणीनंतर, आता विमानतळ ऑपरेटर नियमांनुसार विमानतळ परवान्यासाठी DGCA कडे अर्ज करतील. हे अर्ज १५ मे पासून सुरू होणाऱ्या फ्लाइट ऑपरेशनसाठी असणार आहे. त्यानंतर १५ मे पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रवाशांसाठी सुरु होणार आहे.


दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरु होणार असल्यामुळे नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यावर अनेक रिक्षा चालकांना रोजगाराची सुविधादेखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Navi Mumbai Airport)



काय आहेत वैशिष्टये?


नवी मुंबई विमानसेवा कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी हाताळेल अशी अपेक्षा आहे. सध्या ३.७ किमी धावपट्टी ऑपरेशनसाठी तयार आहे, लवकरच दुसरी धावपट्टी बांधण्याची योजना आहे. त्याचबरोबर भूमिगत मेट्रो द्रुतगती मार्ग, अटल सेतू पूल, बुलेट ट्रेन सेवा या बहुविध वाहतूक पर्यायांमुळे विमानतळ प्रवेशयोग्य होईल आणि प्रवाशांचा प्रवास वेळ देखील कमी होणार आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी

महापालिकेच्या टाऊनहॉल जिमखान्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा भवनाच्या जागेवर

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया ३ दशलक्ष लिटर पाण्याची होणार विक्री

मुंबई: कुलाबा मल जल प्रक्रिया केंद्रात प्रकल्पातून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी प्राप्त होणाऱ्या १० दशलक्ष

मिठी नदीच्या कामाला येत्या १ एप्रिलपासून होणार सुरुवात

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आतापर्यंत कंपन्याच

मुंबईत आतापर्यंत सुमारे ८८ टक्के मालमत्ता कर वसुली

मुंबई: मंगळवार २४ मार्च २०२६ पर्यंत एकूण ६ हजार ४४९ कोटी रुपये म्हणजेच निर्धारित उद्दिष्टाच्या ८७.८६ टक्के इतका

मुंबईतील चारही प्रवेशद्वार सुशोभीकरणाची संकल्पना पुढील १५ दिवसात सादर करा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन