Tuljapur : तुळजाभवानीस अर्धा किलोचा सोन्याचा मुकूट अर्पण

  39

सोलापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तीदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी ठाणे येथील एका दानशूर भक्ताने ५४० ग्रॅम वजनाचा (सुमारे अर्धा किलो) सोन्याचा मुकूट अर्पण केला. आजच्या बाजारात या सुवर्ण मुकुटाची अंदाजे किंमत ५४ लाख रुपयांच्या आसपास आहे. या कुटुंबाचा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे देवीजींची प्रतिमा व महावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडेकर, सुरक्षा निरीक्षक ऋषीकेश पाटील, धार्मिक विभागाचे अमोल कर्डीले आदी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी श्री तुळजाभवानी मातेच्या गाभार्‍यासह चांदीच्या सिंहासनाला विविध प्रकारच्या द्राक्ष फळांनी सजविण्यात आले होते.



सध्या तुळजापूर व परिसरात द्राक्ष बागांची छाटणी सुरू असल्याने असंख्य बागायतदार द्राक्षांचा पहिला बहार मातेचरणी अर्पण करुन द्राक्ष बाजारात विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. यंदा द्राक्षासाठी नैसर्गिक वातावरण पोषक असल्याने तालुक्यात दर्जेदार द्राक्ष विक्रीसाठी येत आहेत. मात्र १०० ते ८० रुपये प्रति किलोने होणार्‍या विक्रीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. गतवर्षी द्राक्षांचा प्रति किलोचा दर ४० ते ५० रुपये किलो होता.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या