ज्येष्ठांसह महिलांचीही एसटी बसची सवलत सुरुच राहणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण


मुंबई (प्रतिनिधी) : एसटी बससेवा तोट्यात असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी बस प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींना टाळे लागणार असल्याच्या चर्चांना गती आली असतानाच खुद्द राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच अशा योजना बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना या स्पष्टीकरणामुळे दिलासा मिळणार असला तरी तोटा कसा भरुन निघणार, याबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.


महायुती सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात असल्याचे मोठे विधान केले होते. त्यामुळे एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद होणार का? याबाबत चर्चा रंगल्या होत्या. महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार नाही. तसेच जेष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत देखील बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.


एसटी महामंडळाच्याबाबतीत आणि राज्याच्या हिताच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयात कोणताही बदल करण्यात येणार नाही. तसेच ज्या योजना एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या आहेत त्या योजनेत देखील कोणताही बदल होणार नाही. तसेच एसटीच्या प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय देखील त्यांच्या कार्यकाळात झाला होता. तसेच ७५ वर्षांच्या पुढील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा निर्णय झाला होता. आता या निर्णयात कुठेही बदल होणार नाही, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.