ज्येष्ठांसह महिलांचीही एसटी बसची सवलत सुरुच राहणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण


मुंबई (प्रतिनिधी) : एसटी बससेवा तोट्यात असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी बस प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींना टाळे लागणार असल्याच्या चर्चांना गती आली असतानाच खुद्द राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच अशा योजना बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना या स्पष्टीकरणामुळे दिलासा मिळणार असला तरी तोटा कसा भरुन निघणार, याबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.


महायुती सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात असल्याचे मोठे विधान केले होते. त्यामुळे एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद होणार का? याबाबत चर्चा रंगल्या होत्या. महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार नाही. तसेच जेष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत देखील बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.


एसटी महामंडळाच्याबाबतीत आणि राज्याच्या हिताच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयात कोणताही बदल करण्यात येणार नाही. तसेच ज्या योजना एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या आहेत त्या योजनेत देखील कोणताही बदल होणार नाही. तसेच एसटीच्या प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय देखील त्यांच्या कार्यकाळात झाला होता. तसेच ७५ वर्षांच्या पुढील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा निर्णय झाला होता. आता या निर्णयात कुठेही बदल होणार नाही, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन