महाशिवरात्रीची आंघोळ बेतली जिवावर, तीन युवकांचा बुडून मृ्त्यू

चंद्रपूर : राजुरा तालुक्यापासून जवळ असलेल्या चुनाळा येथील घराजवळील नागरिकांसोबत महाशिवरात्रीच्या पर्वावर वर्धा नदी येथे आंघोळ करण्यासाठी गेलेल्या तुषार शालिक आत्राम (१७) मंगेश बंडू चणकापुरे (२०) अनिकेत शंकर कोडापे (१८) यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २६) घडली आहे.


महाशिवरात्री निमित्त चुनाळा येथील काही नागरिक चुनाळा येथील वर्धा नदी घाटावर आंघोळ करण्यासाठी जात असता त्यांच्यासोबत घराजवळील तुषार आत्राम, मंगेश चणकापुरे, अनिकेत कोडापे हे तिन्ही युवक आंघोळ करण्यासाठी गेले नदीपात्रात महिला एका बाजूला आंघोळ करीत असताना महिलापासून दूर काही अंतरावर जाऊन तिन्ही युवक आंघोळ करीत होते. यावेळेस त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यामध्ये बुडू लागले वेळेस त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला असता जवळ असलेला रामचंद्र रागी या युवकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही.


घटनेची माहिती चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांना मिळताच त्यांनी राजुरा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी राजुरा पोलिस पोहचली सदर घटना बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने बल्लारपूर पोलिस सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा शोध घेऊ लागले. राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी आपत्ती विभाग चंद्रपूर येथे फोन करून बोटीची व्यवस्था केली व बोटीद्वारे मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे. यात दोन युवकांचे मृतदेह मिळाले होते.d

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री