मध्य प्रदेशात नाश्ता, बिहारमध्ये दुपारचे जेवण आणि आसामध्ये रात्रीचे जेवण...२४ तासांत तीन राज्यांत पोहोचले पीएम मोदी

  47

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ तासांत तीन राज्यांचा मॅरेथॉन दौरा केला. त्यांनी २४ फेब्रुवारीला सकाळचा नाश्ता मध्य प्रदेशात केला. त्यानंतर दुपारचे जेवण बिहारमध्ये केले आणि रात्रीचे जेवण ते आसामध्ये जेवले. खरंतर, पंतप्रधान मोदी २३ फेब्रुवारीलाच मध्य प्रदेशात पोहोचले होते. त्यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृ्ष्णा शास्त्री यांच्या निमंत्रणावरून छतरपूर येथे गढा गावांत बागेश्वर धाम चिकित्सा तसेच विज्ञान संशोधन संस्थेचा शिलान्यास केला.


या रुग्णालयाची निर्मिती बागेश्वर धाम ट्रस्ट करून केली जात आहे. या रुग्णालय निर्मितीचे उद्दिष्ट वंचित गटातून आलेल्या कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार प्रदान करणे. रुग्णालय हे अत्याधुनिक केमोथेरपी आणि कॅन्सर उपचारांच्या सुविधांनी सुस्सज असेल. याच्या पुढच्याच दिवशी २४ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींनी भोपाळमध्ये ग्लोबल इनव्हेस्टर्स समिटचे उद्घाटन केले.


यानंतर पंतप्रधान मोदी बिहारमध्ये पोहोचले. त्यांनी भागलपूरमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जनसभा घेतली. यावेळेस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता जारी केला. यावेळेस पंतप्रधान मोदींनी विविध विकासयोजनेंचेही उद्घाटन केले.


बिहारनंतर पंतप्रधान मोदी सोमवारी संध्याकाळी आसामच्या दौऱ्यावर पोहोचले. येथे ते सरुसजाई स्टेडियममध्ये आयोजित झुमोईर बिनंदिनी २०२५ या कार्यक्रमात सामील झाले.

Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत