Bogus PhD : बोगस पीएचडी धारकांचे धाबे दणाणले! पदव्यांची तपासणी होणार

मुंबई : राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातून (जेजेटीयू) पीएच.डी. (Bogus PhD) मिळविणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी एका पत्राद्वारे देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना अशा बोगस पीएच.डी. तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बोगस पीएच.डी पदवीधारक किती महाशय आहेत, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.


विद्यापीठांच्या प्रत्येक कृतीवर यूजीसीचे नियंत्रण असते. तथापि, राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाने बोगस पीएच.डी. पदवी दिल्याचे दिसून आले. त्यामुळे यूजीसीच्या स्थायी समितीने जेजेटीयूद्वारे सादर केलेली माहिती, डेटा विश्लेषण, तपासणी आणि मूल्यांकनानुसार पीएच.डी.च्या तरतुदीचे पालन झाले नाही, असा ठपका ठेवला आहे.



पीएच.डी.च्या (Bogus PhD) पुरस्कारासाठीचे नियम आणि शैक्षणिक मापदंडाला छेद दिला. तसेच यूजीसी पीएच.डी.च्या तरतुदींचे पालन करण्यात जेजेटीयू का अपयशी ठरले? हे स्पष्ट करण्याची संधी देण्यात आली होती. तथापि, जेजेटीयूने फारसा प्रतिसाद दिला नाही, असे यूजीसीने पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे यूजीसीच्या स्थायी समितीने या बोगस पीएच. डी. प्रकरणी कठोर पावले उचलली आहेत.

Comments
Add Comment

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन

कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर

Holi Special ST Buses : होळीसाठी धावणार एसटीच्या १९३ बस; महामंडळातर्फे विशेष सेवा जारी

मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे

प्रकल्प स्मार्ट अंतर्गत मुंबई - अहमदाबाद उच्चगती रेल्वे स्थानक क्षेत्र विकासाला एमएमआरडीएची गती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे

मराठीला रोजगार आणि जागतिक ओळखीची भाषा बनवणार - मराठी संवर्धनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : मराठी ही केवळ संस्कृतीची नव्हे तर अर्थकारण आणि रोजगाराचीही भाषा व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे

Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट, काय म्हणाले?

मुंबई: आज 'मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट लिहित मराठीजनांना,