Bogus PhD : बोगस पीएचडी धारकांचे धाबे दणाणले! पदव्यांची तपासणी होणार

मुंबई : राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातून (जेजेटीयू) पीएच.डी. (Bogus PhD) मिळविणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी एका पत्राद्वारे देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना अशा बोगस पीएच.डी. तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बोगस पीएच.डी पदवीधारक किती महाशय आहेत, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.


विद्यापीठांच्या प्रत्येक कृतीवर यूजीसीचे नियंत्रण असते. तथापि, राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाने बोगस पीएच.डी. पदवी दिल्याचे दिसून आले. त्यामुळे यूजीसीच्या स्थायी समितीने जेजेटीयूद्वारे सादर केलेली माहिती, डेटा विश्लेषण, तपासणी आणि मूल्यांकनानुसार पीएच.डी.च्या तरतुदीचे पालन झाले नाही, असा ठपका ठेवला आहे.



पीएच.डी.च्या (Bogus PhD) पुरस्कारासाठीचे नियम आणि शैक्षणिक मापदंडाला छेद दिला. तसेच यूजीसी पीएच.डी.च्या तरतुदींचे पालन करण्यात जेजेटीयू का अपयशी ठरले? हे स्पष्ट करण्याची संधी देण्यात आली होती. तथापि, जेजेटीयूने फारसा प्रतिसाद दिला नाही, असे यूजीसीने पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे यूजीसीच्या स्थायी समितीने या बोगस पीएच. डी. प्रकरणी कठोर पावले उचलली आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल

खरडलेल्या शेतजमिनींसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, मोफत !

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ