Chhaava : महाराष्ट्रातील सर्व आमदारांना लवकरच 'छावा' चित्रपट दाखवणार - अजित पवार

नवी दिल्ली : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' (Chhaava) सिनेमानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडतो आहे. 'छावा'ची क्रेझ इतकी आहे सगळीकडे हाऊसफुल्ल शो सुरू आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, पराक्रम, त्यांचं बुद्धीचातुर्य पाहून प्रत्येकाचं मन गर्वानं फुलून जातंय. आता हा 'छावा' चित्रपट महाराष्ट्रातील सर्व आमदारांना चित्रपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच 'छावा' चित्रपट पाहिला आहे. यानंतर आता राज्यातील सर्व आमदारांना हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल माहिती दिली.



दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, "महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होत आहे. त्यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी सर्व आमदारांना मंत्रालयासमोर असलेल्या चित्रपटगृहात 'छावा' चित्रपट दाखवण्यात येणार आहे". आमदारांना चित्रपट दाखवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं.


अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनींही 'छावा' चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तसेच हा चित्रपट गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आलाय.या चित्रपटाला देशातूनच नाहीतर परदेशातूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विक्की कौशलचं प्रेक्षक भरभरून कौतूक करताना दिसत आहेत. सिनेमात रश्मिका मदांनाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तर अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत ३२६.७२ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Comments
Add Comment

मुंबईतले आठ हजार बॅनर हटवले

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबईत नवरात्रौत्सवात मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचे बॅनर आणि फलक लावण्यात आले होते. यामुळे

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल