शशी थरुर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज

  50

नवी दिल्ली : केरळ काँग्रेसचे नेते खासदार शशी थरुर हे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. ते गांधी परिवारावरही नाराज असल्याचे वृत्त आहे. एका पॉडकास्टमध्ये थरुर यांनी त्यांच्या नाराजीला मोकळी वाट करुन दिली. याआधी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे थरुर यांनी जाहीररित्या कौतुक केले.



काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणि प्रवक्ते मोदींवर टीका करत असताना थरुर यांनी वेगळी भूमिका घेतली. पॉडकास्टमध्ये तर शशी थरुर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वालाच खडे बोल सुनावले. 'केरळमध्ये काँग्रेसच्या मतांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. हे प्रमाण वाढवता येईल. पण याकरिता काँग्रेसला स्वतःच्या कामाची पद्धत बदलावी लागेल. जनतेशी थेट संवाद साधावा लागेल. जनतेच्या आशाआकांक्षा, स्वप्न समजून घेऊन त्यासाठी काम करावं लागेल. जनतेमध्ये पक्षाविषयी विश्वास निर्माण करावा लागेल. केरळमध्ये डाव्या पक्षांनी नागरिकांमध्ये स्वतःची उत्तम प्रतिमा निर्माण केली. लोकांना विश्वास वाटला म्हणून ते आजही निवडणुका जिंकत आहेत. तर भाजपाने देश पातळीवर स्वतःविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. काँग्रेस असे करताना दिसत नाही. काँग्रेसचे मताधिक्य अर्थात व्होट शेअर वाढताना दिसत नाही. कालबाह्य होत असलेल्या विचार आणि संकल्पना पक्षाला मताधिक्य वाढवून देणार नाही'; असे शशी थरुर म्हणाले.



केरळमध्ये काँग्रेसची ताकद मर्यादीत आहे. अनेकांना काँग्रेस पक्ष आवडत नाही. पण या प्रतिकूल परिस्थितीतही मी निवडणूक जिंकतोय कारण लोकांना माझं म्हणणं पटतंय. त्यांना माझ्याविषयी विश्वास आहे. हा विश्वास ढळू देणार नाही, असे शशी थरुर म्हणाले.
Comments
Add Comment

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात

LPG Cylinder Price Cut : LPG ग्राहकांना दिलासा! आजपासून कमी झाली किंमत; 'हे' आहेत नवे दर

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी (July 2025) एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाला

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ