शशी थरुर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज

नवी दिल्ली : केरळ काँग्रेसचे नेते खासदार शशी थरुर हे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. ते गांधी परिवारावरही नाराज असल्याचे वृत्त आहे. एका पॉडकास्टमध्ये थरुर यांनी त्यांच्या नाराजीला मोकळी वाट करुन दिली. याआधी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे थरुर यांनी जाहीररित्या कौतुक केले.



काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणि प्रवक्ते मोदींवर टीका करत असताना थरुर यांनी वेगळी भूमिका घेतली. पॉडकास्टमध्ये तर शशी थरुर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वालाच खडे बोल सुनावले. 'केरळमध्ये काँग्रेसच्या मतांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. हे प्रमाण वाढवता येईल. पण याकरिता काँग्रेसला स्वतःच्या कामाची पद्धत बदलावी लागेल. जनतेशी थेट संवाद साधावा लागेल. जनतेच्या आशाआकांक्षा, स्वप्न समजून घेऊन त्यासाठी काम करावं लागेल. जनतेमध्ये पक्षाविषयी विश्वास निर्माण करावा लागेल. केरळमध्ये डाव्या पक्षांनी नागरिकांमध्ये स्वतःची उत्तम प्रतिमा निर्माण केली. लोकांना विश्वास वाटला म्हणून ते आजही निवडणुका जिंकत आहेत. तर भाजपाने देश पातळीवर स्वतःविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. काँग्रेस असे करताना दिसत नाही. काँग्रेसचे मताधिक्य अर्थात व्होट शेअर वाढताना दिसत नाही. कालबाह्य होत असलेल्या विचार आणि संकल्पना पक्षाला मताधिक्य वाढवून देणार नाही'; असे शशी थरुर म्हणाले.



केरळमध्ये काँग्रेसची ताकद मर्यादीत आहे. अनेकांना काँग्रेस पक्ष आवडत नाही. पण या प्रतिकूल परिस्थितीतही मी निवडणूक जिंकतोय कारण लोकांना माझं म्हणणं पटतंय. त्यांना माझ्याविषयी विश्वास आहे. हा विश्वास ढळू देणार नाही, असे शशी थरुर म्हणाले.
Comments
Add Comment

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.

Days In February : फेब्रुवारी महिन्यात 'इतके' दिवस बँका राहणार बंद! राज्यानुसार यादी जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दरवर्षी बँकांच्या सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करत असते, ज्यामध्ये देशभरातील सार्वजनिक

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या