दुबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती विराट कोहली. ...
काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आणि प्रवक्ते मोदींवर टीका करत असताना थरुर यांनी वेगळी भूमिका घेतली. पॉडकास्टमध्ये तर शशी थरुर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वालाच खडे बोल सुनावले. 'केरळमध्ये काँग्रेसच्या मतांचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. हे प्रमाण वाढवता येईल. पण याकरिता काँग्रेसला स्वतःच्या कामाची पद्धत बदलावी लागेल. जनतेशी थेट संवाद साधावा लागेल. जनतेच्या आशाआकांक्षा, स्वप्न समजून घेऊन त्यासाठी काम करावं लागेल. जनतेमध्ये पक्षाविषयी विश्वास निर्माण करावा लागेल. केरळमध्ये डाव्या पक्षांनी नागरिकांमध्ये स्वतःची उत्तम प्रतिमा निर्माण केली. लोकांना विश्वास वाटला म्हणून ते आजही निवडणुका जिंकत आहेत. तर भाजपाने देश पातळीवर स्वतःविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. काँग्रेस असे करताना दिसत नाही. काँग्रेसचे मताधिक्य अर्थात व्होट शेअर वाढताना दिसत नाही. कालबाह्य होत असलेल्या विचार आणि संकल्पना पक्षाला मताधिक्य वाढवून देणार नाही'; असे शशी थरुर म्हणाले.
पालघर : केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील एव्हिओ (Aveo) नावाच्या औषध कंपनीवर कारवाई केली आहे. या कंपनीच्या टॅपेंटाडॉल आणि कॅरिसोप्रोडॉल ...
केरळमध्ये काँग्रेसची ताकद मर्यादीत आहे. अनेकांना काँग्रेस पक्ष आवडत नाही. पण या प्रतिकूल परिस्थितीतही मी निवडणूक जिंकतोय कारण लोकांना माझं म्हणणं पटतंय. त्यांना माझ्याविषयी विश्वास आहे. हा विश्वास ढळू देणार नाही, असे शशी थरुर म्हणाले.