Ind vs Pak: कोहलीचे 'विराट' शतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

दुबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती विराट कोहली. विराट कोहलीच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.


पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी २४२ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान ४५ बॉल राखत पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. विराट कोहलीने १११ बॉलमध्ये १०० धावा केल्या.


पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी महागडा ठरला. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत केवळ २४१ धावा केल्या. पाकिस्तानकडून सौद शकीलने ६२ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर कर्णधार मोहम्मद रिझवानने ४६ धावा ठोकल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. त्यानंतर हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले.


त्यानंतर भारतीय संघ २४२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा झटपट बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीची जोडी जमली. या जोडीने १०० धावसंख्या पार केली. शुभमन गिलने ४६ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक केवळ ४ धावांनी हुकले.


कोहलीने या सामन्यात जबरदस्त शतक ठोकले. कोहली ९६ वर खेळत असताना भारताला विजयासाठी २ धावा हव्या होत्या. कोहलीने जबरदस्त चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. यासोबतच भारताने विजय साकारला.

विराट कोहलीचे हे वनडेतील ५१वे शतक होते. कोहलीने खुशदिल शाहच्या बॉलवर जबरदस्त चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. सोबतच भारताने विजय मिळवला. कोहलीने १११ बॉलमध्ये नाबाद १०० धावा ठोकल्या. कोहलीच्या आधी श्रेयस अय्यरने

Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक

भारताचे विजयी आघाडीकडे लक्ष्य

रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी-२० लढत रायपूर : नागपूरमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, भारतीय

T20 World Cup मध्ये नव्या संघाची एन्ट्री होणार, बांगलादेशच्या बहिष्कारानंतर ICC लवकरच घोषणा करणार

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी T20 वर्ल्ड कप २०२६ वर बहिष्कार घालत असल्याची

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी