Ind vs Pak: कोहलीचे 'विराट' शतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

  96

दुबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती विराट कोहली. विराट कोहलीच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.


पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी २४२ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान ४५ बॉल राखत पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. विराट कोहलीने १११ बॉलमध्ये १०० धावा केल्या.


पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी महागडा ठरला. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत केवळ २४१ धावा केल्या. पाकिस्तानकडून सौद शकीलने ६२ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर कर्णधार मोहम्मद रिझवानने ४६ धावा ठोकल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. त्यानंतर हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले.


त्यानंतर भारतीय संघ २४२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा झटपट बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीची जोडी जमली. या जोडीने १०० धावसंख्या पार केली. शुभमन गिलने ४६ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक केवळ ४ धावांनी हुकले.


कोहलीने या सामन्यात जबरदस्त शतक ठोकले. कोहली ९६ वर खेळत असताना भारताला विजयासाठी २ धावा हव्या होत्या. कोहलीने जबरदस्त चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. यासोबतच भारताने विजय साकारला.

विराट कोहलीचे हे वनडेतील ५१वे शतक होते. कोहलीने खुशदिल शाहच्या बॉलवर जबरदस्त चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. सोबतच भारताने विजय मिळवला. कोहलीने १११ बॉलमध्ये नाबाद १०० धावा ठोकल्या. कोहलीच्या आधी श्रेयस अय्यरने

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट