Ind vs Pak: कोहलीचे 'विराट' शतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

दुबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती विराट कोहली. विराट कोहलीच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.


पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी २४२ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान ४५ बॉल राखत पूर्ण केले. या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. विराट कोहलीने १११ बॉलमध्ये १०० धावा केल्या.


पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी महागडा ठरला. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत केवळ २४१ धावा केल्या. पाकिस्तानकडून सौद शकीलने ६२ धावांची सर्वाधिक खेळी केली. तर कर्णधार मोहम्मद रिझवानने ४६ धावा ठोकल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. त्यानंतर हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले.


त्यानंतर भारतीय संघ २४२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा झटपट बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीची जोडी जमली. या जोडीने १०० धावसंख्या पार केली. शुभमन गिलने ४६ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक केवळ ४ धावांनी हुकले.


कोहलीने या सामन्यात जबरदस्त शतक ठोकले. कोहली ९६ वर खेळत असताना भारताला विजयासाठी २ धावा हव्या होत्या. कोहलीने जबरदस्त चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. यासोबतच भारताने विजय साकारला.

विराट कोहलीचे हे वनडेतील ५१वे शतक होते. कोहलीने खुशदिल शाहच्या बॉलवर जबरदस्त चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. सोबतच भारताने विजय मिळवला. कोहलीने १११ बॉलमध्ये नाबाद १०० धावा ठोकल्या. कोहलीच्या आधी श्रेयस अय्यरने

Comments
Add Comment

पंजाब किंग्सची धुरा श्रेयस अय्यरकडे?

रिकी पाँटिंगच्या अनुपस्थितीत संघ निवडण्याची जबाबदारीही येणार मुंबई  : बीसीसीआय सध्या आयपीएल २०२६ च्या मिनी

दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ‘पलटवार’

चंदिगड : मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०