आवक घटल्याने कांद्याच्या दरात भाव वाढ

लासलगाव : नाशिक जिल्हा हा राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. निफाड आणि लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. परंतु सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक घटलेली दिसून येते.

घाऊक बाजारात जानेवारीत ८० ते ९० हजार मेट्रिक टन असलेली कांदा आवक फेब्रुवारीत की सुमारे २० टक्के म्हणजे १६ ते १८ हजार मेट्रिक टनांनी कमी झाली.परिणामी लाल कांदा दरात किलोमागे सात ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे. जानेवारीत घाऊक बाजारात कांदा १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटल होता. फेबुवारीच्या मध्यावर त्याला सरासरी २२०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे महिनाभरात क्विंटलमागे झालेली सरासरी दरवाढ ७०० ते ८०० व किरकोळ बाजारात किलोमागे झालेली दरवाढ ७ ते ८ रुपये आहे.

विशेष म्हणजेऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये ज्या तुलनेत कांदा बाजारात विक्रीसाठी येतो, त्यापैकी यंदा १५ ते २० टक्के आवक कमी आहे. जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्येही लाल कांदा सरासरी २१ ते २८ रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. तर मंगळवारी लासलगाव बाजार समितीमध्ये ३० रुपये किलो सर्वाधिक दर मिळाला. भारतातून बांगलादेशात सर्वाधिक कांदा निर्यात होत असते. मात्र त्यासाठी बांगलादेशचे आयात शुल्क व भारतातून २० टक्के निर्यात शुल्क असल्याने देशात दर स्थिर ठेवण्यासाठी निर्यातमूल्य हटविण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, देशांतर्गत बाजारपेठेत आवक वाढून कांदा दर घसरण्याची शक्यता आहे. दर स्थिर ठेवण्यासाठी शासनाने निर्यातमूल्य हटविण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण कायम राहील, असे म्हटले जात आहे. गतवर्षी उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर मिळतअसल्याने यंदा नाशिक विभागात दोन लाख ५६ हजार ८४७ हेक्टरवर रब्बी कांदा लागवड झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात दोन लाख २४ हजार ३३० हेक्टर वर लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा आवक ही अधिक रहाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये केंद्र शासनाविरोधात नाराजी आहे. निर्यातशुल्क रद्द केल्यास दर वाढण्याची भिती असल्याने शासन शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी संघटना पदाधिकार्यांनी सांगितले

Comments
Add Comment

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि

Hanuman Jayanti 2026 जाणून घ्या केव्हा आहे हनुमान जयंती; शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेच महत्व

मुंबई : अंजनीपुत्र आणि पवनपुत्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते.

Jalna Congress : काँग्रेस पक्षाकडून जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांचे निलंबन

जालना : जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

Bigg Boss Marathi 6 : विशालनं वैयक्तिक मर्यादा ओलांडल्या, राकेशच्या कुटुंबियांनी रितेश देशमुखकडे केली मोठी मागणी

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ यंदा अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात आणखीन एका

Aditya Dhar : धुरंधर २ अडचणीत येणार ? प्रसिद्ध फिल्ममेकरचे दिग्दर्शक आदित्य धरवर गंभीर आरोप, कारवाईचाही इशारा

मुंबई : धुरंधर २ सिनेमा जगभरात धूमाकूळ घालत आहे. या सिनेमानं कमाईच्या बाबतीतही सगळे रेकॉर्डब्रेक केले आहेत.

Canada : कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या

कॅनडातील सरे शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख २७