Himachal News : हिमाचल हादरलं !

मंडी : हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे आज, रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३. ७ इतकी मोजण्यात आली. जमिनीच्या आत त्याची खोली ५ किलोमीटर होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार (एनसीएस) सकाळी ८ वाजून ४२ मिनीटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र सुंदरनगर येथील किआर्गी होते.



यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की भूकंपाचे केंद्र ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाजवळ एक तलाव आहे. या प्रदेशात दर २ ते ३ वर्षांनी एकदा लहान आणि कमी तीव्रतेचे भूकंप होतात. यापूर्वी २०१५ मध्ये येथे ३. ३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. हिमाचल प्रदेशसोबतच दिल्ली-एनसीआर तसेच शेजारील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतींच्या आत तीव्र कंपने जाणवली. पहाटे ५ वाजून ३६ मिनीटांनी हा भूकंप जाणवला. दिल्लीच्या धौला कुआं येथील दुर्गाबाई देशमुख विशेष शिक्षण महाविद्यालयाजवळ भूकंपाचे केंद्र असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.


हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोक घराबाहेर पडले. अनेक ठिकाणी भूकंपाच्या कमी तीव्रतेमुळे, बहुतेक लोकांना धक्के जाणवू शकले नाहीत. राज्यातील चंबा, शिमला, कुल्लू, लाहौल स्पीती, कांगडा, किन्नौर आणि मंडी येथील अनेक भाग भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या झोन-५ मध्ये येतात. म्हणूनच येथे वारंवार भूकंप होत राहतात.

Comments
Add Comment

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर