माजी मुख्यमंत्री आतिशी दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री आतिशी यांची निवड करण्यात आली आहे. आज, रविवारी आम आदमी पार्टीच्या पक्ष मुख्यालयात झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीत सर्व आमदारांनी आतिशी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली. त्यांच्या माध्यमातून दिल्ली विधानसभेला पहिल्या विरोधी पक्षनेत्या मिळाल्या आहेत.


आतिशी आता दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावतील. त्या कालका मतदारसंघाच्या आमदार आहेत. आप सरकारमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या कामामुळे पक्षातही त्यांचा लौकिक वाढला आहे.


विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांसारख्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र आतिशी कालकाची आपली जागा वाचवण्यात यशस्वी झाल्या. पक्षातील एक मजबूत महिला चेहरा असल्याने, बैठकीत आतिशी यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले होते.

Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील