९९ टक्के भारतीयांना या सुपरफूडबद्दल माहितीच नाही! खाल्ल्याने मिळतात हे जबरदस्त फायदे

मुंबई: जेव्हा आपण आरोग्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थांचा विचार येतो. यात ड्रायफ्रुट्स, फळे, भाज्या यांचा समावेश होतो. या सगळ्यांमध्ये व्हिटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील अनेक गोष्टींची कमतरता दूर होते.


याशिवाय आवळा, संत्री, हळद आणि लसूण हे पदार्थही सुपरफूड आहेत जे डॉक्टर्स आपल्याला खाण्याचा सल्ला देतात. या सगळ्यांमध्ये एक असे सुपरफूड आहे जे ९९ टक्के भारतीय लोकांना माहिती नाही. आता हा सवाल आहे की हे सुपरफूड नेमके कोणते आहे?


आम्ही ज्या सुपरफूडबद्दल बोलत आहोत ते दुसरे तिसरे कोणतेही नसून राजगिरा आहे. हे धान्य नाही आहे त्यामुळे उपवासाला खाल्ले जाते. मात्र तुम्हाला जाणून घेतल्यावर हैराणजनक वाटेल की जर तुम्ही हे दररोज खाल्ले तर तुमची तब्येत दुपटीने होईल.


१०० ग्रॅम राजगिरामध्ये ३४० मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते. इतकंच नव्हे तर व्हिटामिन बी, व्हिटामिन सी आणि मॅग्नेशियमही आढळते. राजगिरा एकमेव व्हेज पदार्थ ज्यामध्ये ९ प्रकारचे अमिनो अॅसिड्स असतात. याच कारणामुळे हा प्रोटीनचा संपूर्ण व्हेजटेरियन सोर्स मानला जातो.


राजगिरा एक्स्ट्रा फॅट कमी करून तुम्हाला वेट लॉसमध्येही मदत करतात. तुम्ही राजगिरा धान्याप्रमाणेही वापरू शकता. याच्या पिठाची पोळीही तुम्ही खाऊ शकता.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर