मुंबई: जेव्हा आपण आरोग्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थांचा विचार येतो. यात ड्रायफ्रुट्स, फळे, भाज्या यांचा समावेश होतो. या सगळ्यांमध्ये व्हिटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील अनेक गोष्टींची कमतरता दूर होते.
याशिवाय आवळा, संत्री, हळद आणि लसूण हे पदार्थही सुपरफूड आहेत जे डॉक्टर्स आपल्याला खाण्याचा सल्ला देतात. या सगळ्यांमध्ये एक असे सुपरफूड आहे जे ९९ टक्के भारतीय लोकांना माहिती नाही. आता हा सवाल आहे की हे सुपरफूड नेमके कोणते आहे?
आम्ही ज्या सुपरफूडबद्दल बोलत आहोत ते दुसरे तिसरे कोणतेही नसून राजगिरा आहे. हे धान्य नाही आहे त्यामुळे उपवासाला खाल्ले जाते. मात्र तुम्हाला जाणून घेतल्यावर हैराणजनक वाटेल की जर तुम्ही हे दररोज खाल्ले तर तुमची तब्येत दुपटीने होईल.
१०० ग्रॅम राजगिरामध्ये ३४० मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते. इतकंच नव्हे तर व्हिटामिन बी, व्हिटामिन सी आणि मॅग्नेशियमही आढळते. राजगिरा एकमेव व्हेज पदार्थ ज्यामध्ये ९ प्रकारचे अमिनो अॅसिड्स असतात. याच कारणामुळे हा प्रोटीनचा संपूर्ण व्हेजटेरियन सोर्स मानला जातो.
राजगिरा एक्स्ट्रा फॅट कमी करून तुम्हाला वेट लॉसमध्येही मदत करतात. तुम्ही राजगिरा धान्याप्रमाणेही वापरू शकता. याच्या पिठाची पोळीही तुम्ही खाऊ शकता.