Dombivli Railway Station : डोंबिवली, पूर्व रेल्वे स्थानकातील लिफ्टचं बटणं बिघडल्याने प्रवाशांचे हाल

  80

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत असलेली पाटकर रस्त्यावरील उदवाहनाची कळ (बटण) बिघडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानकात झटपट जाण्यासाठी या उदवाहनाचा बहुतांशी प्रवासी वापर करतात. मागील काही दिवसांपासून या उदवहनाची स्कायवॉक दिशेकडील कळ बिघडली. एकदा उदवाहन प्रवासी घेऊन रेल्वे जिन्याच्या दिशेने गेले की पुन्हा उदवाहन तळाची कळ दाबल्यावर खाली येत नाही. या उदवाहनची कळ दुरुस्ती केली जात नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातून रेल्वे स्थानकातील फलाटावर जाण्यासाठी पाटकर रस्त्यावर कैलास लस्सी दुकानालगत रेल्वेचे उदवहन आहे. व्याधी असलेल्या अनेक प्रवाशांना उदवहनच्या माध्यमातून रेल्वे जिन्यावर जाऊन तेथे रेल्वे स्थानकातील फलाटावर किंवा डोंबिवली पश्चिम दिशेकडे जातात.



मागील काही दिवसांपासून उदवाहनच्या वरच्या बाजूकडील कळ (बटण) बिघडली आहे. प्रवासी एकदा तळाच्या भागाकडून उदवाहनमधून रेल्वे जिन्याच्या दिशेने वर गेले की, पुन्हा तळाला असलेल्या प्रवाशांनी वर गेलेली उदवाहन खाली येण्यासाठी तळाची कळ दाबली तरी उदवहन स्वयंचलित पद्धतीने खाली येत नाही. अनेक प्रवासी तळाची कळ दाबत बसतात. त्याचा काही उपयोग होत नाही. रेल्वे जिन्याकडील वरच्या भागातून प्रवासी तळाला येत असेल त्या प्रवाशांनी वरून कळ दाबली की मग उदवाहन खाली येते. जोपर्यंत रेल्वे जिन्याकडून प्रवासी तळ भागात येत नाही, तोपर्यंत उदवाहन वरच्या भागात अडकून पडते. कळ बिघडल्यामुळे हे उदवाहन बंद राहत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, प्रवाशांच्या तक्रारीवरुन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून या उदवाहनमधील बिघाड दुरुस्त करण्याची मागणी केल्याचे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ अध्यक्षा लता अरगडे यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

दोन कोटींच्या अमली पदार्थांच्या म्होरक्याला हैदराबाद विमानतळावर अटक

कल्याण : मानपाडा पोलीसांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात सुमारे दोन कोटी करोड रूपयांचे १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी)

डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच

विजेच्या अघोषित भारनियमनाने बदलापूरकर हैराण बदलापूर : बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. चौथी मुंबई

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास सिंधुदुर्गनगरी : शक्तिपीठ महामार्ग होताना जो जो व्यक्ती