Dombivli Railway Station : डोंबिवली, पूर्व रेल्वे स्थानकातील लिफ्टचं बटणं बिघडल्याने प्रवाशांचे हाल

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत असलेली पाटकर रस्त्यावरील उदवाहनाची कळ (बटण) बिघडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानकात झटपट जाण्यासाठी या उदवाहनाचा बहुतांशी प्रवासी वापर करतात. मागील काही दिवसांपासून या उदवहनाची स्कायवॉक दिशेकडील कळ बिघडली. एकदा उदवाहन प्रवासी घेऊन रेल्वे जिन्याच्या दिशेने गेले की पुन्हा उदवाहन तळाची कळ दाबल्यावर खाली येत नाही. या उदवाहनची कळ दुरुस्ती केली जात नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातून रेल्वे स्थानकातील फलाटावर जाण्यासाठी पाटकर रस्त्यावर कैलास लस्सी दुकानालगत रेल्वेचे उदवहन आहे. व्याधी असलेल्या अनेक प्रवाशांना उदवहनच्या माध्यमातून रेल्वे जिन्यावर जाऊन तेथे रेल्वे स्थानकातील फलाटावर किंवा डोंबिवली पश्चिम दिशेकडे जातात.



मागील काही दिवसांपासून उदवाहनच्या वरच्या बाजूकडील कळ (बटण) बिघडली आहे. प्रवासी एकदा तळाच्या भागाकडून उदवाहनमधून रेल्वे जिन्याच्या दिशेने वर गेले की, पुन्हा तळाला असलेल्या प्रवाशांनी वर गेलेली उदवाहन खाली येण्यासाठी तळाची कळ दाबली तरी उदवहन स्वयंचलित पद्धतीने खाली येत नाही. अनेक प्रवासी तळाची कळ दाबत बसतात. त्याचा काही उपयोग होत नाही. रेल्वे जिन्याकडील वरच्या भागातून प्रवासी तळाला येत असेल त्या प्रवाशांनी वरून कळ दाबली की मग उदवाहन खाली येते. जोपर्यंत रेल्वे जिन्याकडून प्रवासी तळ भागात येत नाही, तोपर्यंत उदवाहन वरच्या भागात अडकून पडते. कळ बिघडल्यामुळे हे उदवाहन बंद राहत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, प्रवाशांच्या तक्रारीवरुन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून या उदवाहनमधील बिघाड दुरुस्त करण्याची मागणी केल्याचे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ अध्यक्षा लता अरगडे यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे