EU Commission : युरोपियन युनियन कमिशनचे अध्यक्ष आणि युरोपचे वरिष्ठ नेतृत्व २७-२८ फेब्रुवारीला भारत भेटीवर

नवी दिल्ली: युरोपियन युनियन कमिशन (EU Commission) च्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) आणि युरोपियन युनियनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शिष्टमंडळ २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. या भेटीदरम्यान, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील, अशी माहिती युरोपियन युनियनच्या भारतातील प्रतिनिधी मंडळाने दिली आहे.


युरोपियन युनियनच्या निवेदनानुसार, नवीन कार्यकाळाच्या सुरुवातीला कॉलेज ऑफ कमिशनर्सचा हा ऐतिहासिक दौरा, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील संबंधांमध्ये वाढणाऱ्या सहकार्याचे द्योतक आहे.


या भेटीदरम्यान, ईयू-भारत शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर एक नवीन धोरणात्मक अजेंडा सादर करण्याची योजना आहे. हा दौरा दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सुरक्षा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पुरवठा साखळी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



युरोपियन कमिशनचे वरिष्ठ सदस्य त्यांच्या भारतीय समकक्ष मंत्र्यांशी चर्चा करतील. तसेच, उर्सुला वॉन डेर लेयन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार असून, त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल.


युरोपियन युनियनच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना वॉन डेर लेयन म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या भू-राजकीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युरोप हा खुल्या भागीदारी आणि सहकार्याचा समर्थक आहे. भारत हा आमचा विश्वासू मित्र आणि सहयोगी आहे, आणि आम्ही दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करत आहोत.


त्या पुढे म्हणाल्या, आम्ही व्यापार, आर्थिक सुरक्षा, लवचिक पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारी मजबूत करण्यास वचनबद्ध आहोत. याशिवाय, सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यही अधिक दृढ करण्याचा आमचा मानस आहे.


युरोप आणि भारत हे लोकशाही मूल्यांवर आधारित समान विचारसरणीचे भागीदार आहेत, त्यामुळे हा दौरा दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नव्या संधी उघडण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय