EU Commission : युरोपियन युनियन कमिशनचे अध्यक्ष आणि युरोपचे वरिष्ठ नेतृत्व २७-२८ फेब्रुवारीला भारत भेटीवर

नवी दिल्ली: युरोपियन युनियन कमिशन (EU Commission) च्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) आणि युरोपियन युनियनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शिष्टमंडळ २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. या भेटीदरम्यान, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील, अशी माहिती युरोपियन युनियनच्या भारतातील प्रतिनिधी मंडळाने दिली आहे.


युरोपियन युनियनच्या निवेदनानुसार, नवीन कार्यकाळाच्या सुरुवातीला कॉलेज ऑफ कमिशनर्सचा हा ऐतिहासिक दौरा, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील संबंधांमध्ये वाढणाऱ्या सहकार्याचे द्योतक आहे.


या भेटीदरम्यान, ईयू-भारत शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर एक नवीन धोरणात्मक अजेंडा सादर करण्याची योजना आहे. हा दौरा दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सुरक्षा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पुरवठा साखळी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



युरोपियन कमिशनचे वरिष्ठ सदस्य त्यांच्या भारतीय समकक्ष मंत्र्यांशी चर्चा करतील. तसेच, उर्सुला वॉन डेर लेयन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार असून, त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल.


युरोपियन युनियनच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना वॉन डेर लेयन म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या भू-राजकीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युरोप हा खुल्या भागीदारी आणि सहकार्याचा समर्थक आहे. भारत हा आमचा विश्वासू मित्र आणि सहयोगी आहे, आणि आम्ही दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करत आहोत.


त्या पुढे म्हणाल्या, आम्ही व्यापार, आर्थिक सुरक्षा, लवचिक पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारी मजबूत करण्यास वचनबद्ध आहोत. याशिवाय, सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यही अधिक दृढ करण्याचा आमचा मानस आहे.


युरोप आणि भारत हे लोकशाही मूल्यांवर आधारित समान विचारसरणीचे भागीदार आहेत, त्यामुळे हा दौरा दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नव्या संधी उघडण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे