EU Commission : युरोपियन युनियन कमिशनचे अध्यक्ष आणि युरोपचे वरिष्ठ नेतृत्व २७-२८ फेब्रुवारीला भारत भेटीवर

नवी दिल्ली: युरोपियन युनियन कमिशन (EU Commission) च्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) आणि युरोपियन युनियनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शिष्टमंडळ २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. या भेटीदरम्यान, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील, अशी माहिती युरोपियन युनियनच्या भारतातील प्रतिनिधी मंडळाने दिली आहे.


युरोपियन युनियनच्या निवेदनानुसार, नवीन कार्यकाळाच्या सुरुवातीला कॉलेज ऑफ कमिशनर्सचा हा ऐतिहासिक दौरा, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील संबंधांमध्ये वाढणाऱ्या सहकार्याचे द्योतक आहे.


या भेटीदरम्यान, ईयू-भारत शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर एक नवीन धोरणात्मक अजेंडा सादर करण्याची योजना आहे. हा दौरा दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सुरक्षा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पुरवठा साखळी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



युरोपियन कमिशनचे वरिष्ठ सदस्य त्यांच्या भारतीय समकक्ष मंत्र्यांशी चर्चा करतील. तसेच, उर्सुला वॉन डेर लेयन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार असून, त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल.


युरोपियन युनियनच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना वॉन डेर लेयन म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या भू-राजकीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युरोप हा खुल्या भागीदारी आणि सहकार्याचा समर्थक आहे. भारत हा आमचा विश्वासू मित्र आणि सहयोगी आहे, आणि आम्ही दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करत आहोत.


त्या पुढे म्हणाल्या, आम्ही व्यापार, आर्थिक सुरक्षा, लवचिक पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारी मजबूत करण्यास वचनबद्ध आहोत. याशिवाय, सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यही अधिक दृढ करण्याचा आमचा मानस आहे.


युरोप आणि भारत हे लोकशाही मूल्यांवर आधारित समान विचारसरणीचे भागीदार आहेत, त्यामुळे हा दौरा दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नव्या संधी उघडण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना