EU Commission : युरोपियन युनियन कमिशनचे अध्यक्ष आणि युरोपचे वरिष्ठ नेतृत्व २७-२८ फेब्रुवारीला भारत भेटीवर

नवी दिल्ली: युरोपियन युनियन कमिशन (EU Commission) च्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन (Ursula von der Leyen) आणि युरोपियन युनियनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शिष्टमंडळ २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. या भेटीदरम्यान, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील, अशी माहिती युरोपियन युनियनच्या भारतातील प्रतिनिधी मंडळाने दिली आहे.


युरोपियन युनियनच्या निवेदनानुसार, नवीन कार्यकाळाच्या सुरुवातीला कॉलेज ऑफ कमिशनर्सचा हा ऐतिहासिक दौरा, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील संबंधांमध्ये वाढणाऱ्या सहकार्याचे द्योतक आहे.


या भेटीदरम्यान, ईयू-भारत शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर एक नवीन धोरणात्मक अजेंडा सादर करण्याची योजना आहे. हा दौरा दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सुरक्षा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पुरवठा साखळी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



युरोपियन कमिशनचे वरिष्ठ सदस्य त्यांच्या भारतीय समकक्ष मंत्र्यांशी चर्चा करतील. तसेच, उर्सुला वॉन डेर लेयन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार असून, त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद होईल.


युरोपियन युनियनच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना वॉन डेर लेयन म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या भू-राजकीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर युरोप हा खुल्या भागीदारी आणि सहकार्याचा समर्थक आहे. भारत हा आमचा विश्वासू मित्र आणि सहयोगी आहे, आणि आम्ही दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करत आहोत.


त्या पुढे म्हणाल्या, आम्ही व्यापार, आर्थिक सुरक्षा, लवचिक पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारी मजबूत करण्यास वचनबद्ध आहोत. याशिवाय, सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यही अधिक दृढ करण्याचा आमचा मानस आहे.


युरोप आणि भारत हे लोकशाही मूल्यांवर आधारित समान विचारसरणीचे भागीदार आहेत, त्यामुळे हा दौरा दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नव्या संधी उघडण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments
Add Comment

चार मिनिटांत ५२ वेळा सॉरी म्हणाला, तरी मुख्याध्यापकांचं दुर्लक्ष

आठवीतल्या मुलाकडून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न मध्य प्रदेश  : रतलाम येथील

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या

जगातील सर्वात मोठ्या १० शहरांची यादी समोर, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली  : संयुक्त राष्ट्रांच्या 'वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स २०२५' या ताज्या अहवालानुसार, जगात

देशात ३० वर्षांत कामगार कमी अन् निवृत्तीधारक वाढणार

भारतावर येणार ‘पेन्शन संकट’! नवी दिल्ली  : भारत सध्या तरुण देश मानला जात असला तरी येत्या ३० वर्षांत वृद्धांची

नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे

‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी साधला संवाद नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या १२८ व्या

डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी हॉटेल व्यावसायिकांना खुशखबर! एलपीजी सिलेंडरच्या दरात घट, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: डिसेंबर महिना सुरू होताच एक आनंदाची बातमी आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी