सौरव गांगुलीच्या कारचा दुर्गापूर एक्सप्रेसवे वर अपघात, थोडक्यात बचावला क्रिकेटर

  48

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीच्या कारला गुरूवारी दुर्गापूर एक्सप्रेस वेवर अपघात झाला. सौरव गांगुली एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, दंतनपूर जवळ एक ट्रक अचानक त्याच्या ताफ्यासमोर आला. यामुळे ड्रायव्हरला अचानक ब्रेक लावावा लागला. यामुळे मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना आदळला. यातील एक गाडी सौरव गांगुलीच्या कारला आदळली.


दरम्यान, या अपघातात सौरव गांगुली आणि त्याच्या ताफ्यातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही. मात्र गांगुलीच्या ताफ्यातील दोन गाड्यांना लागले.


या अपघातानंतर सौरव गांगुलीला साधारण १० मिनिटे रस्त्यावर वाट पाहावी लागली. यानंतर तो कार्यक्रमासाठी रवाना झाला आणि युनिर्व्हसिटीतील कार्यक्रमात सहभागी झाला.


सौरव गांगुली भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा माजी अध्यक्ष आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याची गणती सर्वात आक्रमक आणि प्रभावशाली कर्णधार अशी केली जाते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने परदेशात शानदार कामगिरी केली आणि अनेक ऐतिहासिक विजय मिळवले.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल