सौरव गांगुलीच्या कारचा दुर्गापूर एक्सप्रेसवे वर अपघात, थोडक्यात बचावला क्रिकेटर

  30

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीच्या कारला गुरूवारी दुर्गापूर एक्सप्रेस वेवर अपघात झाला. सौरव गांगुली एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, दंतनपूर जवळ एक ट्रक अचानक त्याच्या ताफ्यासमोर आला. यामुळे ड्रायव्हरला अचानक ब्रेक लावावा लागला. यामुळे मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना आदळला. यातील एक गाडी सौरव गांगुलीच्या कारला आदळली.


दरम्यान, या अपघातात सौरव गांगुली आणि त्याच्या ताफ्यातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही. मात्र गांगुलीच्या ताफ्यातील दोन गाड्यांना लागले.


या अपघातानंतर सौरव गांगुलीला साधारण १० मिनिटे रस्त्यावर वाट पाहावी लागली. यानंतर तो कार्यक्रमासाठी रवाना झाला आणि युनिर्व्हसिटीतील कार्यक्रमात सहभागी झाला.


सौरव गांगुली भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा माजी अध्यक्ष आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याची गणती सर्वात आक्रमक आणि प्रभावशाली कर्णधार अशी केली जाते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने परदेशात शानदार कामगिरी केली आणि अनेक ऐतिहासिक विजय मिळवले.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी