सौरव गांगुलीच्या कारचा दुर्गापूर एक्सप्रेसवे वर अपघात, थोडक्यात बचावला क्रिकेटर

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीच्या कारला गुरूवारी दुर्गापूर एक्सप्रेस वेवर अपघात झाला. सौरव गांगुली एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, दंतनपूर जवळ एक ट्रक अचानक त्याच्या ताफ्यासमोर आला. यामुळे ड्रायव्हरला अचानक ब्रेक लावावा लागला. यामुळे मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना आदळला. यातील एक गाडी सौरव गांगुलीच्या कारला आदळली.


दरम्यान, या अपघातात सौरव गांगुली आणि त्याच्या ताफ्यातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही. मात्र गांगुलीच्या ताफ्यातील दोन गाड्यांना लागले.


या अपघातानंतर सौरव गांगुलीला साधारण १० मिनिटे रस्त्यावर वाट पाहावी लागली. यानंतर तो कार्यक्रमासाठी रवाना झाला आणि युनिर्व्हसिटीतील कार्यक्रमात सहभागी झाला.


सौरव गांगुली भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा माजी अध्यक्ष आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याची गणती सर्वात आक्रमक आणि प्रभावशाली कर्णधार अशी केली जाते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने परदेशात शानदार कामगिरी केली आणि अनेक ऐतिहासिक विजय मिळवले.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण