सौरव गांगुलीच्या कारचा दुर्गापूर एक्सप्रेसवे वर अपघात, थोडक्यात बचावला क्रिकेटर

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीच्या कारला गुरूवारी दुर्गापूर एक्सप्रेस वेवर अपघात झाला. सौरव गांगुली एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, दंतनपूर जवळ एक ट्रक अचानक त्याच्या ताफ्यासमोर आला. यामुळे ड्रायव्हरला अचानक ब्रेक लावावा लागला. यामुळे मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना आदळला. यातील एक गाडी सौरव गांगुलीच्या कारला आदळली.


दरम्यान, या अपघातात सौरव गांगुली आणि त्याच्या ताफ्यातील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही. मात्र गांगुलीच्या ताफ्यातील दोन गाड्यांना लागले.


या अपघातानंतर सौरव गांगुलीला साधारण १० मिनिटे रस्त्यावर वाट पाहावी लागली. यानंतर तो कार्यक्रमासाठी रवाना झाला आणि युनिर्व्हसिटीतील कार्यक्रमात सहभागी झाला.


सौरव गांगुली भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा माजी अध्यक्ष आहे. भारतीय क्रिकेटमध्ये त्याची गणती सर्वात आक्रमक आणि प्रभावशाली कर्णधार अशी केली जाते. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने परदेशात शानदार कामगिरी केली आणि अनेक ऐतिहासिक विजय मिळवले.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र

IND vs PAK : महिला क्रिकेट संघही पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करणार नाही

नवी दिल्ली : दुबईतील आशिया कप दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाप्रमाणे ५ ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे होणाऱ्या

IND vs WI: शुभमन गिल पुन्हा ठरला 'अनलकी'! सलग सहाव्यांदा नाणेफेक गमावली

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये

अभिषेक शर्माने रचला इतिहास! ICC T20I फलंदाजी क्रमवारीत आजवरचे सर्वोच्च रेटिंग

नवी दिल्ली: भारताचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)