Snowfall, landslides : बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद, ३०० वाहने अडकली; १३ राज्यांमध्ये पावसाचा इशारा

मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे (Snowfall, landslides) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्गावर सुमारे ३०० हून अधिक वाहने अडकली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून महामार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


हवामान खात्याने शुक्रवारी (२१ फेब्रुवारी ) १३ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य प्रदेशात शुक्रवारपासून दिवस आणि रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.तर ओडीशामध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जोरदार वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडीशा राज्य सरकारने २५ जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.



दिल्ली, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी (२० फेब्रुवारी) हलका पाऊस झाला. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागातही जोरदार हिमवृष्टी झाली. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला. यामुळे सुमारे ३०० वाहने अडकली आहेत. नाचिलाना, शेरबीबी आणि बनिहाल-काझीगुंड चारपदरी बोगद्यांमध्ये अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यात येत आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


हिमाचल प्रदेशातील बहुतेक भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाल्यानंतर शुक्रवारी (दि.२१) पश्चिमी विक्षोभ कमकुवत होईल. आज (दि.२१), फक्त जास्त उंचीवर हलकी हिमवर्षाव होऊ शकते. इतर भागात हवामान स्वच्छ होईल. २२ फेब्रुवारी रोजी राज्यातील उंच आणि मध्यम उंचीच्या भागात हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.


राजस्थानमध्ये वादळ आणि पाऊस थांबल्यानंतर तापमानात पुन्हा एकदा घट झाल्याने सौम्य थंडी वाढली. २२ फेब्रुवारीपासून हवामान पुन्हा एकदा बदलेल आणि तापमान २-३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. २५-२६ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील अनेक शहरांमध्ये दिवसाची उष्णता वाढू शकते. गेल्या २४ तासांत राजस्थानमध्ये हवामान स्वच्छ होते आणि गुरुवारी सर्व जिल्ह्यांमध्ये सूर्यप्रकाश होता. गुरुवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सुमारे अर्धा तास गारपीट झाली. शुक्रवारी सकाळपासून गाझियाबाद, सहारनपूर आणि बुलंदशहरसह पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट नोंदली गेली.


गेल्या २४ तासांत पंजाबमध्ये झालेल्या पावसानंतर तापमानात घट झाली आहे. हवामान केंद्राच्या मते, गेल्या २४ तासांत सरासरी कमाल तापमान -४.७ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. तथापि, राज्यात हे सामान्यपेक्षा -१.८ अंश सेल्सिअस कमी आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान भटिंडा येथे २५.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन