SSC Board Students : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या गेटवर मृत्यू

  55

तेलंगणा : तेलंगणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या गेटवर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.



तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या श्रीनिधी हिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. श्रीनिधी दहावीत शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिधी ही सकाळी शाळेत जात होती. शाळेत जात असताना तिच्या अचानक छातीत दुखू लागलं. तिला थोडावेळ अस्वस्थ वाटू लागलं. छातीत कळ आल्यानंतर ती क्षणात खाली कोसळली. शाळेतील एका शिक्षकाने श्रीनिधीची तब्येत बिघडल्याचे बघितले. यानंतर श्रीनिधीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि प्राथमिक उपचार दिले. पण तिने प्रतिसाद दिला नाही.


नंतर श्रीनिधीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. या रुग्णालयात तपासणी करुन डॉक्टरांनी श्रीनिधीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेने कामारेड्डी परिसर हादरला आहे. दरम्यान दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा