SSC Board Students : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या गेटवर मृत्यू

तेलंगणा : तेलंगणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या गेटवर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.



तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या श्रीनिधी हिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. श्रीनिधी दहावीत शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिधी ही सकाळी शाळेत जात होती. शाळेत जात असताना तिच्या अचानक छातीत दुखू लागलं. तिला थोडावेळ अस्वस्थ वाटू लागलं. छातीत कळ आल्यानंतर ती क्षणात खाली कोसळली. शाळेतील एका शिक्षकाने श्रीनिधीची तब्येत बिघडल्याचे बघितले. यानंतर श्रीनिधीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि प्राथमिक उपचार दिले. पण तिने प्रतिसाद दिला नाही.


नंतर श्रीनिधीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. या रुग्णालयात तपासणी करुन डॉक्टरांनी श्रीनिधीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेने कामारेड्डी परिसर हादरला आहे. दरम्यान दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव