SSC Board Students : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या गेटवर मृत्यू

तेलंगणा : तेलंगणातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या गेटवर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. विद्यार्थिनी सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.



तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या श्रीनिधी हिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. श्रीनिधी दहावीत शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिधी ही सकाळी शाळेत जात होती. शाळेत जात असताना तिच्या अचानक छातीत दुखू लागलं. तिला थोडावेळ अस्वस्थ वाटू लागलं. छातीत कळ आल्यानंतर ती क्षणात खाली कोसळली. शाळेतील एका शिक्षकाने श्रीनिधीची तब्येत बिघडल्याचे बघितले. यानंतर श्रीनिधीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि प्राथमिक उपचार दिले. पण तिने प्रतिसाद दिला नाही.


नंतर श्रीनिधीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. या रुग्णालयात तपासणी करुन डॉक्टरांनी श्रीनिधीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेने कामारेड्डी परिसर हादरला आहे. दरम्यान दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments
Add Comment

कर्नाटकात खळबळ, माजी आमदाराच्या मुलाची हत्या; जळालेल्या कारमध्ये...

धारवाड: कर्नाटकच्या धारवाडजवळील एका निर्जनस्थळी जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने हत्येचा

Indian Railway Rules: रेल्वे तिकीट आठ दिवसांपूर्वी रद्द केल्यावर रिफंड...; रेल्वेच्या नियमांत महत्त्वाचा बदल

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या

Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक मंगळवारी रात्री

Supreme Court : अन्य धर्म स्वीकारल्यास एससी-एसटी दर्जा होणार रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी अधिनियमासंदर्भात आज, मंगळवार २४ मार्च रोजी मोठा निर्णय दिला आहे.

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील